बुधवार, २५ सप्टेंबर, २०१३

....आणि मी प्रेमात पडलो.


....आणि मी प्रेमात पडलो.
सांजवेळ होती.मी माझी दुचाकी घेत रस्त्याच्या एका कडेने सरळ मार्गी जात होतो .
 सूर्य मावळतीला त्याच्या परतीच्या मार्गी जाण्यास अतिशय व्याकूळ झाला होता .
 त्याची चाललेली ती धडपड समोरच नजरेला भिडत, मनाला चैतन्य बहाल करत होती.
 त्याची सोनेरी तांबूस प्रकाश किरणे माझ्या अंगा खांद्यला छेदत रस्त्यावर विखुरलेल्या लाल मातीशी लगट करत होती . त्यातच लहरी वारा हळुवार कानाशी गुंजत मनाशी संगीत खेळी करू पाहत होता .
रस्त्यावर तशी रहदारी न्हवती . तुरळक वाहनांची ये जा आणि एक दोन माणसे अधून मधून दिसत होती तेवढीच .
दुर्तफा झाडी आणि अधून मधून दिसणारी हिरवीगार शेतजमीने , आणि त्यावर डोलणारी लुसलुशीत गवतांची पातं . त्या रमणीय वातावरणात , मी माझ्या दुचाकीचा वेग थोडा कमी करत नजरेत ते सारे क्षण टिपून घेण्याच्या प्रयत्नात होतो .
तितक्यात नजरेतील प्रकाशकिरणे थेट एका सुंदर चेहऱ्याकडे खिळून राहिली .नेत्रपटला वरती ती सुंदर आकृती हळू हळू एकजूट होऊ लागली .
गहू वर्णीय गोलाकार चेहरा, काळे भोर सुंदर डोळे ,त्या नजरेतील तिचे आदरयुक्त प्रेमळ भाव .......,
पाहूनच मन वेडावलं .
पाणी भरावयास आलेल्या, विहिरीवरील काठाशी जमलेल्या अनेक मुलीन पैकी ती एक होती . सर्वात उठून दिसणारी . एक सुंदर गोड परी ....
तिच्यावरची नजर काहीकेल्या हटत न्हवती .माझी दुचाकी मात्र तिच्याच वेगेत पळत होती. थोड्या पुढे एका वळणावर उंचच उंच चहूकडे आपले बाहू पसरलेल्या त्या वृक्षाभोवती हळूच माझ्यासकट माझी दुचाकी आदळली. आणि खरच मी प्रेमात पडलो तो असा .
असच थोडा विरंगुळा ........
तुमची प्रतिक्रिया आवश्यक ....
- संकेत पाटेकर

सोमवार, १६ सप्टेंबर, २०१३

नाती मनाची प्रेमाची अन विश्वासाची

नाती मनाची प्रेमाची अन विश्वासाची
काही नाती हि फक्त दोन अक्षांरा पुरतीच मर्यादित असतात . त्यात आपलेपण हा नसतोच . साध्या - छोट्या अपेक्षा हि जिथे पूर्ण करता येत नाहीत ते नातं कसल ते असूनही मृत असल्यासारखंच .
खर तर अपेक्षा ह्या करूच नये , पण पण साध्या छोट्या अपेक्षा हि करू नये का ? बर ह्या अपेक्षा हि कुणाकडून हि नसतात , त्या आपल्याच माणसांकडून असतात . पण त्या हि काही वेळा पूर्ण होत नाही . अशा वेळेस थोडस निराशपण येतंच , पण म्हणून त्या व्यक्तीला दोष देण हि योग्य नाही . जे नशिबात आहे ते आहे . पण तरी हि ...
काही सेकंदासाठी का होईना , आपल्या व्यक्ती साठी आपल्या बिझी शेड्युल्ड मधून थोडा वेळ हा काढावा. ५ मिनिट का होईना थोडं बोलाव , कधीतरी भेटाव ..., मी म्हणत नाही वारंवार फोनवरच राहावं , प्रत्येकवेळी भेटाव - भेटत राहावं ...पण कधी तरी ..केव्हातरी ... या इवल्याश्या मनाला दिलासा ...
खर तर ...
एकमेकांच एकमेकांवर मनापासून प्रेम असेल , एकमेकांविषयी ''आपलेपणाची'' भावना दृढ असेल, आणि जिथे सामंज्यस पणाची जाणीव असेल तेच नातं खरया अर्थानं ''विश्वासाचं नातं' असत . आणि त्या नात्यात प्रसन्नतेच तेज कायम झळाळत राहत.
अहो , नाती आहेत म्हणून आपण आहोत , आपण आहोत म्हणून आपलेपण आहे , एकमेकांवर प्रेम आहे .
मनातले काही ..
नातं तुझं माझं
संकेत य पाटेकर
१६.०९.२०१३

सोमवार, १९ ऑगस्ट, २०१३

I have done Big mistake in my life''


''I have done Big mistake in my life''
सकाळ्च मोबाईलची रिंग खणखणू लागली.
इतक्या सकाळच कुणाचं call म्हणून मोबाईलकडे सहज नजर फिरवली , नंबर ओळखीचाच होता. आलेला call रिसीव्ह केला . आणि बोलण्यास सुरवात केली .
नित्य नेहमीचाच आवाज सुरवातीला वाटला , पण हळू हळू शब्दातली गंभीर भावमुद्रा मनावर उमटू लागली .
पुढे शब्दांसोबत अश्रूंचाही बांध फुटू लागला . तसं तसं चेहर्यावर प्रश्नार्थी भाव उमटू लागले.
'' संकेत मी आयुष्यात फार मोठी चूक केलेय.
'I have done Big mistake in my life, feeling guilty n upset ''
तिच्या ह्या एकएक शब्दांसोबत अश्रुथेंब हि वाहत होते . तुटक तुटक शब्दात ती बोलत होती.
'' संकेत, कुणासाठी खरचं compramise करू नकोस , sacrifice करू नकोस , त्यांना त्याची काहीच किंमत नसते .
तिच्या ह्या वाक्यात मात्र सत्यता होती . आयुष्यात कधी अशी एखादी व्यक्ती येते . जिच्यावर आपला जीव जडला जातो. एक घट्ट नातं जुळल जातं. ज्या साठी आपण बऱ्याच गोष्टी सर्वस्वी पणाला लावतो . पण शेवटी त्या व्यक्तीला आपल्या ह्या साऱ्याची काहीच किंमत नसते . अस जेंव्हा कळत तेंव्हा मनाचं संतुलन साहजिकच बिथरत .
अशा वेळेस झालं ते विसरून , काय तो त्यातून बोध घेऊन आपल्या पाउल वाटेने पुढे निघत जायचं. आयुष्याचा एक तो भाग होता अस समजून पुढे निघायचं. बस हेच हाती असत .
आयुष्य असंच अनेकानेक चांगल्या वाईट घटनांनी भरलेलं आहे . त्यात अडकून न राहता हसत खेळत पुढे चालत राहण आणि इतरना हसवत राहण हेच जीवन आहे .
मनातले काही ...
नातं तुझं माझं
संकेत पाटेकर
१२.०८.२०१३

शनिवार, १७ ऑगस्ट, २०१३

शिकून सुद्धा अडाणी ...ते अडाणीच


शिकून सुद्धा अडाणी ...ते अडाणीच व्यवस्थित टापटीपपणा आणि सूट बुटात असणारी एखादी व्यक्ती ..घरात , ऑफिस मध्ये व्यवथित वागेल . पण घर बाहेर पडताच .... एखाद्या ना समज मुलासारखी .... अक्कल नासेलेली आपण इतकी पदवी घेतलेय शिकलोय ह्याच त्यांना काहीच मुल्य नाहि ., खर तर लाज वाटायला हवी . आपण जे काही करतोय त्याची ... तुम्हाला वाटेल मी काय हे वायफळ बडबडतोय ........काय लिहितोय , खर तर मित्र मंडळी ... एक साधासाच विचार आहे . पण खरच शिस्तीची गरज आहे .
जाता येता रस्त्याने आपणास एक चित्र नक्कीच पाहायला मिळत असेलच . एखादी व्यक्ती एखद्या दुकानातून काही खाद्य पदार्थ विकत घेते , आणि त्याने पोट तृप्ती झाल्यानंतर त्यातून निर्माण झालेला केरकचरा , कागदाचा एखदा बोळा असो , प्लास्टिक असो , टरफलं असो वा इतर काही ...आपल्या आसपास कुठे हि टाकून पसार होते . ह्याउलट तंबाकूच्या पिच्कारया उडवण ..असे प्रकार हि सर्रास दिसतातच .
बस मध्ये म्हणा , ट्रेन मध्ये म्हणा , रस्त्याने चालताना म्हणा , driving करत असतना म्हणा एखद्या ऐतिहासिक स्थळी म्हणा ........ह्याना शिस्त नि नीती मुल्य ती नाहीच.
घरात ह्यांच्या स्वच्छता , टापटीपपणा , पण घरा बाहेर सार्वजनिक ठिकाणी घाण करायची .
हे शोभत का ? हा प्रश्न स्वतःने स्वतःलाच विचारा ? रस्त्येन चालताना आपणच एका ठिकाणी कचरा करायचा ...आणि तिथे कचर्याचा ढीग साचल्यावर मात्र दुसर्यांच्या नावावर बोंबा मारायची . हे असे प्रकार .. निदान शिकलेल्या माणसांनी तरी शिकल्या सारखं थोडं तरी वागा.
जिथे स्वच्छता असते , तिथले वातावरण हि छान , मोकळ असत . मनाला ताजतवान करणार . देशात अनेक प्रश्न आहेत . पण सर्व प्रथम खरच मुल्यशिक्षणाची गरज आहे .
चला तर मग स्वच्छतेची शिस्त पाळू ......
- संकेत पाटेकर
१७.०८.२०१३

शुक्रवार, १६ ऑगस्ट, २०१३

वाद हे होतंच असतात . एकमेकांना समजून घेण्याची वृत्ती हवी .


रागापेक्षा देवाने प्रत्येकाला सामंज्यसपणा अधिक दिला असता ..तर मला वाटतं कित्येक नात्यांमधली जवळीकता नि त्यातली माधुर्यता कायम तशीच टवटवीत राहिली असती.
व्यक्ती व्यक्ती दुरावल्या नसत्या .......नात्यातला सुगंधितपणा तसाच निखळपणे दरवळत राहिला असता. पण हल्ली अस घडतं नाही . ऐकमेकांच कुणी ऐकूनच घेत नाही ? समजण्याइतपत माणसं आहेत तरी कुठे ? एक ऐकतो नि दुसरा संतापतो ..मग दोघे हि एकेमेकांशी ऐकेनासे होतात. हा वाद इथेच मिटत नाही ,तो तसाच ज्वलंत राहतो. जोपर्यंत जो तो एकमेकांपासून दुरावत नाही .
पूर्वी एकत्रित कुटुंबीय पद्धत असे .., आजही आहे , मी नाही अस म्हणत नाही. पण मोजण्या इतपतच असे काही कुटुंबीय असतील. बहुतेक जण हल्ली ह्या धावत्या पळत्या दुनियेत ...एकमेकांपासून दूर असलेलंच पसंद करतो.
नात्यातली सुवासिकता हरवून बसतो. काही वेळा अस करणं भाग हि असत. मी घरातल्या प्रत्येक व्यक्ती बद्दल बोलतोय . आई - बाबा - भाऊ बहिण , मोठा भाऊ - वाहिनी - जे कुणी घरात असतील .
वाद हे होतंच असतात . एकमेकांना समजून घेण्याची वृत्ती हवी .
- संकेत य पाटेकर

प्रश्न पडल्यावरच त्याची उत्तर शोधावी लागतात .
- संकेत

जगावं तर ह्या पावसा सारखं..


जगावं तर ह्या पावसा सारखं.. कुणी काहीही बोलो , त्याला हवं तेंव्हा तो बरसतो . हवं तेंव्हा येतो , हवं तेंव्हा निघून जातो . कुणी त्याला चांगलं म्हणत, तर कुणी शिव्या शाप देतं. पण तरीही तो सर्वांना हवा असतो . त्याच्या असण्यातच बऱ्याच गोष्टी सामावलेल्या असतात .
म्हणून... जगावं तर ह्या पावसा सारखं... कुणी कितीही काहीही बोलो , आपल्या परीने आपण जगायचं . पण जगता जगता ह्या पावसा सारखं , तो जसा सर्वांना हवा असतो , तसं आपण ही सर्वांना हवे असू , असंच काहीतरी करत राहायचं .
- संकेत य पाटेकर

जिथे शांतता नांदते .....तिथे मनाची एकाग्रता वाढते ...!!

तारुण्य...


तारुण्य, तरुणपण हि अशी स्थिती आहे , जिथे घरातील जबाबदारयान सोबत , घरा बाहेरील येणाऱ्या जबाबदाऱ्यांच , तसेच समस्यांचं , अडचणींच .. प्रेम , नातं , नात्यातील भावनिक गुंत्यांच , अशा अनेकानेक गोष्टींच भार मनावर एकाच वेळी दडल जातं.
अशा वेळेस मनाचा संतुलन बिघडण्याची शक्यता हि नाकरता येत नाही . पण अशा हि परिस्थितीतून , ह्या साऱ्या गोष्टीतून जो स्वतःला सावरतो .....व्यवस्थित सार हाताळून जो पुढे जातो तो आयुष्यात यशस्वी होतो .
- संकेत य पाटेकर

सोमवार, २९ जुलै, २०१३

मनाची जडण घडण हि आपल्या विचारांवर अवलंबून असते ..


ह्या २५ तारखेपासून म्हणजेच माझ्या वाढ दिवसापासून अनेकानेकांचे शुभेच्छा आणि त्यांचे अनुभवी विचार एका पाठोपाठ एक मनावर धडाडत आहेत .
एखादी वस्तू बर्थ डे गिफ्ट म्हणून मिळते खरी, ' मित्रांकडून , नातेवाईकन कडून , पण मला ह्यावेळेस शुभेच्छांच आणि विचारांच पुष्प गुच्छच मिळाल ..मिळतंय अजूनही
मनाची जडण घडण हि आपल्या विचारांवर अवलंबून असते . आपण कसे विचार करतो , त्यावरच बऱ्याच गोष्टी अवलंबून असतात .
मनास आकार देण्याच काम मात्र , आपल्या समाजातील विविध घटित- अघटीत घटना करत असतात , तसेच आपल्या कुटुंबातील वयामानाने मोठ्या असलेल्या व्यक्ती त्यांचे अनुभवी विचार आपल्या समोर मांडून आपल्या मनाला एक विशिष्ट्य आकार देत असतात . त्यातून आपण घडत असतो .
माझ्या वाढदिवशी मध्य रात्रीपासूनच शुभेच्छांचा वर्षाव झाला .
संध्याकाळी आलेल्या एका call ने मात्र शुभेन्छ्यान सोबत शाब्दिक मारा देखील केला. पण त्या मागे प्रेम दडल होत . आपलेपणाची जाणीव होती . कुठेतरी आपण चुकतोय , वेगळ्या वळणावर पाउल टाकतोय हे त्या मनास उमगून आल होत . आणि त्याच साठी तिने समजुतीचा शाब्दिक मारा चालवला होता (माझी प्रेमळ बहिणी ती ) .
दुसर्या दिवशी सहज रस्त्याने चालत असता एका मित्राशी योगायोगानेच म्हणा भेट घडली ,
आणि बोलता बोलत त्याने त्याचे किमती अनुभव शेअर करण्यास सुरवात केली . रोजच्या ह्या धका धकीच्या जीवनात आपल्याला वेळ तसा मिळतो कुठे? . ऑफिस घर -ऑफिस ह्यातच आठवड्यातले सहा दिवस भुरकन निघून जातात .
घरच्यांना वेळ देण्यात आणि घरातली कामे करण्यातच आलेला रविवार हि तसाच निघून जातो . त्यात मग आपल्या आवडी निवडी जपता येत नाही ,मित्रांसोबत कुठे बाहेर पडता येत नाही , मित्रांशी ओळखी वाढविता येत नाही. जीवन हे सुंदर असून ते सुंदरतेने जगता येत नाही . म्हणून आठवड्यातून दोनदा तरी सुट्टी असावी . जेणेकरून हे जीवन जीवन म्हणून जगता येईल.
दुसरी गोष्ट म्हणजे ''आउट ऑफ बॉक्स विचार करन''
आपण एका कंपनीत ठराविक एकच अस काम दिवसेंदिवस , वर्ष वर्ष करत असतो , त्यामुळे इतर कामे हाताळायची गरजच पडत नाही . आपण एका चौकटीत राहूनच आपली कामे करत असतो .
त्यामुळे तुम्हाला कुणी काहीतरी वेगळ अस एखाद छोट मोठ काम करण्यास सांगितल आणि ते तुम्हाला जमल नाही तर ...
तुला हि गोष्ट येत नाही अस कुणी म्हणायला नको ..
अरे हे काम हाच /हीच करू शकते /शकतो अस म्हणायला हव . प्रत्येक गोष्ट आपणास करता आली पाहिजे .
त्या रात्री सहज मित्राला भेटण्यास म्हणून निघालो . आणि भेट झाल्यावर बोलता बोलता तिथे जवळपास विक्रीसाठी असलेल्या गणेश मूर्ती पाहण्यास म्हणून गेलो , तेंव्हा त्या विक्रेत्या काकांनी बऱ्याच गोष्टी सहजतेणे सांगून टाकल्या . त्यात शिक्षणाच महत्व होत . प्रामाणिकता , विश्वासार्हता अशा हि अनेक गोष्टी होत्या . आपल्या बोलण्यावरच सर्व काही आहे . हे त्यांनी ठामपणे सांगितल . ओळख नसूनही ओळख असल्यासारखं मनसोक्त मनातले भाव ते उलगडत गेले .
आता शनिवार निघून गेला आणि रविवार उजाडला दिवसाची लगभग आरामात सुरु झाली . दुपार होत आली आणि पाउले उल्हास नगरच्या वाटेला निघू लागली . पुन्हा एका प्रिय व्यक्तीच्या भेटीला .
१) आपला आनंद कुणावर Depend ठेवू नये , कुणावर Depend राहू नये .
२) आपल्या मूळे हा प्रकार घडला , अस घडायला नको होत . अस Gilty Feel हि कधी करू नये .
३) जे विधी लिखित आहे ते घडत असत . आपण ते स्वीकारायचं . पुढे जायचं .
४) आपल्या मनाचं संतुलन आपण राखायच .
५) ''नियम'' मधला ''नि' बाजूला काढला कि उरतो तो ''यम'' म्हणून नियमा प्रमाणेच वागावं . नाही तर यम आहेच ...!!
६) आपल्या बोलण्यातूनच आपला स्वभाव आपलं वागण कळत, म्हणून बोलाव, बोलतं व्हाव.
अशा कितीत्तारी चांगल्या गोष्टी चांगले विचारांचं गुच्छ मला मिळाल .
मनातले काही ..
संकेत पाटेकर
२९.०७.२०१३

मंगळवार, ९ जुलै, २०१३

अपेक्षा .....


अपेक्षा .....
आपल्या माणसांकडूनच आपण अपेक्षा फार ठेवतो . आणि तेच कारण असतं काहीवेळेस असलेल्या विश्वासाला तडा जाण्याचं..
. त्याच दोष मात्र आपण सर्वस्वी समोरच्याला देऊन मोकळे हि होतो लगेच , पण खरी चूक हि आपलीच असते, कारण अपेक्षा ठेवणारे आपले आपणच असतो .
अपेक्षा ह्या आपल्या माणसांकडूनच नाही कराव्यात तर कुणा कडून कराव्यात हा ? हा प्रश्न देखील लगेच उद्भवणारच ......पण त्या प्रश्नाचं उत्तर देखील तयार असत..
अपेक्षा ह्या असाव्यात ...पण फार नसाव्यात , ज्या आहेत त्या समोरच्याकडून पूर्ण होत नसेल तरी त्याच दुःख नसावं . कारण समोरचा त्याच्या वतीने पूर्णपणे प्रयत्नशील असतो , जर त्याच्या तुमच्यावर अगदी जीवापाड प्रेम असेल. तुमच्यावर विश्वास असेल तर ........
पण प्रत्येक वेळीस त्याच्या प्रयत्नांना यश येइलच असंही नाही .त्यामुळे आपल्या माणसांकडून ठेवलेल्या अपेक्षा पूर्ण झाल्या नाहीत तरी त्याची खंत मनी नसावी . नाहीतर जीवन जगण असह्य होईल .
आपल्या जशा अपेक्षा असतात , तशा समोरील व्यक्ती कडून हि असतात, हे हि लक्षात ठेवावं . पण अपेक्षा पूर्ण नाही झाल्या तरी त्याच दुखं नसावं .....अन त्यासाठी कधी कुणाचा विश्वास तोडू नये. कारण तुटलेला विश्व्वास पुन्हा मिळवण , जुळवण खूप अवघड असत.
- संकेत य पाटेकर
०९.०७.२०१३

मुंबईची जीवन वाहिनी ..


कधी कधी एक विचार मनात येउन जातो , कि येन गर्दीच्या वेळी मुंबईसारख्या ठिकाणी लोकल ट्रेन ने प्रवास करणाऱ्या ज्या व्यक्तीमध्ये १५- २० मिनिटाच्या त्या अवधीचा , त्या प्रवासाचा , ' त्रास सहन करून घेण्याची बिलकुलच क्षमता ज्यांच्याकडे नसते . त्या व्यक्ती , त्यांच्या घरी , त्यांच्या ऑफिस मध्ये त्यांच्या मित्रान सोबत कश्या वागत असतील बरे .......?
प्रश्नच पडतो , पण त्या प्रश्नाला काही एक अर्थ नसतो. ज्याच्या त्याच्या जीवनाचा तो प्रश्न ..मला प्रश्न पडून काय तो उपयोग . ? पण असो ,
सांगायचं तात्पर्य कि , मुंबई ची हि लाखो लोकांची जीवनवाहिनी ,आपली लोकल ट्रेन , सर्वात मोठी आणि पहिली गोष्ट शिकवते ती , सहनशीलता, आणि मानवता धर्म.
काही लोकांचा अपवाद वगळता , ह्याच दर्शन नित्य नेहमीच आपणास घडतं. पण ह्याच बरोबर अशा अनेकानेक गोष्टींच जीत जागतं दर्शन हि लोकल ट्रेन करून देते , पण त्यासाठी तशी डोळस वृत्ती हवी आणि संवेदनशील मन . आणि ते सर्वांकडेच असत नाही का . ..
मनातले काही...
संकेत य पाटेकर .
०९.०७.२०१३

बुधवार, २६ जून, २०१३

तिचं अस्तित्व ...


एक छोटासा प्रयत्न ....पुन्हा एकदा ...माझ्या लेखणीतून ..
तिचं अस्तित्व....
ट्रिंग ट्रिंग ट्रिंग .........
मोबाईलची रिंग वाजत होती. त्या रिंग ने, ' तिची नजर डेस्क वर असलेल्या आपल्या मोबाईल कडे वळली. आलेला कॉल हा त्याचाच आहे हे कळल्यावर , ती स्वतहा:शीच पुटपुटली- हा पुन्हा पुन्हा का कॉल करतोय ? सांगितले ना एकदा नाही जमणार म्हणून.. पुन्हा पुन्हा तोच प्रश्न ...का त्रास देतोय हा ?
डोक्यावर आपले दोन्ही हात कवटाळून ती स्वताहाच्या नशिबाला दोष देत होती .
 ऑफिस मध्ये हि घरातले छोटे मोठे वाद तिला स्वस्त बसू देत न्हवते. त्यामुळे ऑफिसातल्या कामात हि लक्ष लागेनासे झालं होतं विचारांच्या साखळीत तीच मन गुरफटून जात होत.
दोन वर्ष होवून गेली लग्नाला , पण ह्या दोन वर्षात स्वतःसाठी देखील कधी वेळ मिळाला नाही , मानसिक सुख म्हणावं तर नाहीच. त्यात धावपळ ..हा आजारपण कंटाळले मी ह्या जीवनाला..
नकोस वाटतंय आता ....काहीच...
का कुणास ठाऊक लग्न केलं.
खंर तर लग्न लग्न करायचं अस मनात सुद्धा न्हवत, पण मुलीची जात ना, न करून कस चालेल ?
लग्न केलेच पाहिजे,अडकले ह्या बेडीत ..तुरुंगवास नुसता .
जवळच्याच एका मित्र परिवारातील एकाने मागणी घातली होती.
 एका कार्यक्रम दरम्यान त्याने मला पाहिलं होत. तितकंच, ' त्याला मी आवडले , तिथपासून भेटीसाठी काही ना काही निमित्त साधून तो आवर्जून येत असे , भेटत असे .
मला तो पसंद होता असे मूळीच न्हवतं .
खंर तर लग्न हा विषयच मला नको हवा होता . मुलगी असून सुद्धा एक मुलगा म्हणून मला माझ्या आई - बाबांच्या सोबत रहायचं होत कायमच . त्यांच्या सेवेत हे जीवन व्यतीत करायचं होत .
आम्हां पाच बहिणींना इतके वर्ष त्यांनी काबाड कष्ट करून ,जीवाचं रान करून आम्हाला शिकून सावरून लहानाचं मोठ केलं, चांगले संस्कार दिले.आणि आता त्यांच्या ओसरत्या वयात अशा आजरपणात मी त्यांना सोडून दुसर्यांच्या घरी जावू ? असे विचार मला नेहमीच गुरफटून ठेवायचे.
मला हे योग्य वाटत न्हवत . पण वाटून न वाटून उपयोग तो काय ?
मी एक मुलगी , आणि मुलींच्या वाटेला हे यायचंच.
कितीसा काळ असतो तो , आई बाबांस सोबत घालवलेला , भुर्रकन उडून देखील जातो. कधी, कसे लहानसे मोठे होतो हे हि कळत नाही. आई -बाबांचा प्रेम , आपल्या बद्दलची त्यांची काळजी , त्याचे प्रेमळ शब्दगुच्छ . त्यांचा मम्त्वेचा स्पर्श ............त्याचा सहवास............. सगळ कस ..........
तेवढ्यात पुन्हा फोन खणाणतो :- ट्रिंग ट्रिंग ट्रिंग
त्या रिंग ने त्या विचारांची संपूर्ण घडीच कोसळते, ती त्या तंद्रीतून बाहेर पडते .
 डेस्क वर ठेवलेल्या मोबाईल कडे तिचं लक्ष जात .
पुन्हा त्याचाच कॉल ...क्षणभर ती काहीसा विचार करते ...आणि तो कॉल रिसीव्ह करते .
HELLO HELLO.... बोल ....
-------------------------------------------------------------------------------------------------------------
मनाचा अस्वस्थपणा माणसाला कधी स्वस्थ बसू देत नाही .
त्याच्याशी बोलण झाल्यावर ती पुन्हा तिच्या ऑफिस च्या कामाला लागली.
मनात मात्र तो विषय चघलतच होता. पण तरी हि दिलेलं काम तिला सायंकाळ पर्यंत पूर्ण करायचंच होत. त्यासाठी तो विषय तिने सध्या तरी डोक्यातून बाजूला सारायचे ठरवलं . नि पटपट दिलेल्या कामास जुंपली .
सायंकाळचे ७:०० वाजले होते . दिलेलं काम वेळेत पूर्ण करून ती ऑफिस मधून निघू लागली .
तेवढ्यात मोबाईलची रिंग लागली . त्याचाच call होता , तिने रिसीव्ह केला.\

Hello बोल ..
अ .. मी आता निघतोय ऑफिस मधून , लवकर ये , वेळेत ? त्याने फार काही न बोलता फोन ठेवून हि दिला.
मनातल्या अस्वस्थेचे भावनिक चित्र आता तिच्या चेहऱ्यावर उमटू लागले होते. सकाळपासून त्याचे किती कॉल , दुपारचा तो एक कॉल वगळता मी एकही कॉल त्याचा रिसीव्ह केला न्हवता.
बाहेर जायचं म्हणतोय ? मनाशीच काहीतरी पुटपुटल्यासारख तिन केल . त्याला मी कालच म्हणाले होते, मी उद्या आई कडे जाणार आहे . तरी हि बाहेर जायचं आहे , बाहेर जायचं आहे ? कुठे जाणार आहे ते हि धड सांगत नाही .
कित्येक दिवस झाले आईकडे जाईन म्हणते, पण हल्ली वेळ मिळतोय कुठे ? सकाळी लवकर उठून सर्वांच्या आवडी निवडीचा विचार करून केलेला डबा घेऊन, बाकी इतर गोष्टी पटापटा आटपून धावत पळतच ऑफिस गाठायचं आणि संध्याकाळी उशिरा पुन्हा घरी गेल्यावर पुन्हा त्यातच जुपायचं , धुणी भांडी , कपडे , जेवण करता करताच घड्याळाचे काटे कधी १२ वर स्थिरावतात तेच कळत नाही . रात्री उशिरा झोपायचं नि पहाटे पुनः लवकर उठायचं . हेच नित्य क्रम ठरलेलं...
स्वतःच्या आवडी निवडी पूर्ण करायला ,स्वतःच स्वास्थ्य जपायला इथे सवड नाही. तिथे इतरांच्या माझ्याकडून असलेल्या अपेक्षा मी काय पूर्ण करणार ? म्हणूनच आता मी इतर बंधन, नाती गोती ह्या पासून दूरच राहायचं ठरवल आहे. बस्स सध्या तरी काही नकोच .....
ऑफिस मधून ती केव्हाच बाहेर पडली होती ...रस्त्याने चालता चालता हि तिच्या विचारांची गती काही कमी होत न्हवती. विचारांच्या ह्या सोबतीमुळे कधी ती त्या स्थळी पोहोचली ते तिलाच कळल नाही. तेवढ्यात समोरच उभ्या असलेल्या आपल्या नवऱ्या कडे तिचं लक्ष गेल. दोघांची नजर भेट झाली. ती काही बोलली नाही. तो मात्र लगेच बाईक ला किक मारून तयारीत राहिला. ती बाईक वर आसनस्थ झाली. आणि बाईक आणि ते दोघे असा प्रवास सुरु झाला .
------------------------------------------------------------------------------------------------------------
ठरवून सुद्धा काही गोष्टी मना सारख्या होत नाही .तेंव्हा खरच खूप मनस्ताप होतो .केली गेलेली सर्व तयारी, मेहनत त्या क्षणी तरी वाया जाते . आज हे करावं अस मनी ठरवावं , आणि त्याच्या नेमकच उलट विपरीत अस काही घडावं , दुसरं काहीतरी काम निघावं , असच काहीतरी घडतं राहत .
ह्या नियतीचा खेळ देखील अजब असतो आणि ती हा खेळ खेळण्यास नेहमीच तत्पर असते. कधी कुठे , कसे फासे टाकावे, ते तिला चांगलच ठाऊक असतं अन त्यातूनच ती आपल्या प्रसंगी मनाचा वेध घेत असते.
स्वतःला आपण ह्या कडवट जीवन खेळी मधून कसे सावरतो ह्याकडेच तीच कटाक्षान लक्ष लागलेलं असत. आणि त्यावरूनच ती त्या व्यक्तीच्या सहनशिलतेचा,तिच्या जिद्दीचा , तिच्या प्रसंगी मनाचा वेध घेत राहते.
रात्रीचे २ वाजून गेले होते. तीनच्या च्या आसपास तास काटा हळू हळू आगेकूच करत होता. तरी हि तिचं मन काही स्वस्थ बसेना , मनाची तगमग चालूच होती. झोप काही लागत न्हवती. रात्री उशिरा घरी परतल्यावर , सासू आणि तिच्या मध्ये पुन्हा एकदा वाद झाला होता . नेहमीच होतो , होत राहतो , शुल्लक-शुल्लक कारणावरून ...
पण आज वादाचा अवाका जरा जास्तच मोठा होता. आणि त्या विचारांनीच तिला पछाडून सोडले होते .
रात्रभर मनाची ती तळमळ , ते असंख्य विचार , तिला झोप काही लागलीच न्हवती , सकाळी पुनः लवकर उठून सर्व काही आवरता घेत ती पुनः कामावर निघू लागली . मनात एक निश्चय करून ...आज नक्की घरी जाईन .........आई कडे .
------------------------------------------------------------------------------------------------------------
इमारतीतले एक एक मजले - एक एक पायऱ्या सप सप चढत ती दारी - वऱ्हांड्यात पोहोचली. दार अर्ध उघडंच होत .थोड आत सारलं ..
Hiii ...मम्मा ..
कशी आहेस ग ? घरात पाऊल टाकताच क्षणी , आईला पाहून ती म्हणाली. मी बरी आहे, ये बैस
माझं काय, आहे रोजचंच , काढतेय दिवस आपला ..आजार काय पिच्छा सोडत नाही. कामं हि हल्ली होत नाही पण तरी हि करते , करत असते बसायची सवय नाही ना , काही ना काही करत राहील कि बर वाटत बघ ..
प्यायला पाणी आणू ...? तिला पाहून त्या म्हणाल्या. नको , थांब मी घेते , आईला उगाच त्रास नको म्हणून ती स्वतः उठून स्वयंपाक गृहात जाते. अन थोड्या वेळेत पुन्हा आई शेजारी येउन बसते .
बोल , काय चाललंय ? कानावर आल्यात काही गोष्टी माझ्या ? एकवार तिच्याकडे पाहत अन पुन्हा हातातले काम करत , त्या तिला म्हणाल्या .
मम्मा , कंटालळे ग ..
का लग्न केलंत माझं ? काय बिघडल असत का ?
आईनी तिच्याकडे एकवार पाहिलं, ती कुठल्याश्या विचारात मग्न होती अन भरभर बोलत होती.
एक क्षण हि आराम नाही ग , मानसिक शांतता नाही ....... कांटाळले ग मम्मा , खरच खूप कंटालळे , मनातल्या भावनांना ती एक मोकळी वाट करून देत होती. ..
आई हि एकमेव अशी छाया असते , जी आपल्या मुलांच्या सुख दुखाच्या प्रत्येक क्षणी सोबत करते .
आपल्याला समजून घेण्यापासून ते आपल्याला समज देण्यापर्यंत ती नेहमीच पुढाकार घेत असते . त्यामुळे निशंक पणाने आईकडे मन हलकं करतां येत .
ती हि आपल मन हलक करत होती.... मनातल बोलत होती . आई मात्र तिच्या बोलण्याने धीर गंभीर होत होत्या , त्यांच्या मन आता त्यांना स्वस्थ बसू देत न्हवत ,
लाडीगोडीने, प्रेमाने , वाढवलेल्या, आपल्या ह्या मुलीच्या वाटेला काय आलाय हे ,ह्या हे विचारांनी , तिच्या काळजीने ते कष्टी होत होत्या .
इतके चांगले एक एक स्थळ येत होती पण तिने ते नाकारली , म्हणायची , मला लग्नच नाही करायचं , मला तुमच्या सोबतच राहायचं आहे . हट्टी नि तापट स्वभाव थोडा , घेतला रोष ओढवून सर्वांचा , बरेच दिवस तिच्याशी कुणी काही बोलत न्हवते , पण काही एक महिन्यानंतर कशी बशी राजी झाली स्वताहून लग्नासाठी .., पण लग्ना साठी तिने जो वर वरला तो काय विचार करून देव जाणे , सुरवातीचे लग्ना नंतरचे काही दिवस आनंदित होते, पण पुढे मात्र जस जसे दिवस पुढे जावू लागले , तस तसे आनंद तिच्या जीवनातून विरघळू लागला . त्याच अस्तित्वच जणू नाहीस झालं.
रोज रोज घरात वाद वाढू लागले . त्यात एकदा त्याने (तिच्या नवरयाने )तिच्यावर हात हि उचलला होता. आजवर आम्ही कधी आमच्या मुलीवर हात उगारला नाही . पण त्याने कहरच केला . कधी तिला घर सोडून जा म्हणून सांगतो , तर कधी काय तर कधी काय ..........कस होणार ह्या पोरीच .
आपल्या आईच्या चेहरयावरील प्रश्नार्थी काळजीयुक्त भाव पाहून क्षणभर ती थांबली , आपल बोलन तीन थांबवलं .
थोडावेळ ती तशीच शांत राहिली . अन एकाकी बाजूला ठेवलेली पर्स आपल्या हाती घेतली . नि येते ग आई , अस म्हणून निघू लागली .
अग थांब , काहीतरी खाऊन जा ? चपाती भाजी ? चहा ठेवते ......
नको आई , घरी जेवण बनवायच आहे अजून ..बरीच कामे आहेत , निघायला हव . अस म्हणत , आईचा चरण स्पर्श करून , आशीर्वाद घेऊन ती निघू लागली ......भरभर भरभर.. घराचा व्हरांडा ओलांडत ...
-----------------------------------------------------------------------------------------------------------------
सहवास हा काही क्षणाचाहि का असेना ...पण तो नेहमीच हवासा वाटतो.
जर ती व्यक्ती आपली जिवाभावाची - जिवलग असेल तर ,त्यांच्या सहवासात घालावंलेले , त्यांच्या सहवासातले ते काही क्षण हि मनाला उत्तुंग आनंद देऊन जातात खरच ...
आज किती दिवसाने आईला भेटले ..खरच खूप बर वाटलं. मनाला ताजेपणाचा स्पर्शच झाला जणू ! असे हे क्षण सोडले तर बाकी मात्र मनाला पार खचून टाकतात. अगदी गुदमरून टाकतात हे क्षण ..
आईकडून ती थेट.... घरी निघून आली होती . माहेर नि सासर काही हाकेच्या अंतरावरच .अवघ्या १०-१५ मिनिटाचं पण तरीही आईकडे जाण्यचा योग हा क़्वचित कधी येतो .असो आपल्या नशिबीच हे लिहल आहे. काय करणार , स्वतःच्या मनाशी कुजबूज करत, चालत चालत ती कधी घरा शेजारी पोहचली . ते तिलाच कळल नाही.
गेट शेजारीच सासूबाई कुणाशीतरी फोन वर बोलत उभ्या होत्या .त्यांना पाहून तीचि पाउलं जरा अडखळली . पण काही न बोलता पाउलं पुढे टाकत ती तशीच आत शिरली .
घरात आल्यावर मात्र नेहमी प्रमाणे कामाचा ढीग पसरला होता. भांडी - कपडे होतेच , पुन्हा त्यात जेवण हि , ते हि नवऱ्याच्या आणि सासूच्या आवडी निवडी नुसार बनवायचं .
मी हि घरात आहे , माझ्या हि काही आवडी निवडी आहेत . मला काही हवंय नकोय ह्याच मात्र कुणाला देण घेण नाही . सून हि आपल्या मुलीसारखीच असते . आपल घरदार सोडून सासरी येताना ,सासरी तिला स्वतंत्रपणे वावरायला , मुक्तपणे बोलायला घरातली मंडळी तशी स्वतंत्र मनाची हवी असतात . समजून घेणारी - समजावून सांगणारी हवी असतात .
पण माझ्या नशिबी कुठे आलंय ते ....
- क्रमश :-

शनिवार, १८ मे, २०१३

दुभंगलेली मन...


दुभंगलेली मन एकत्रित करताना ..आपल्या मनाचा हि त्यात विचार करावा लागतो . सहज जुळलेल , अन जवळीक साधलेल एखादं नातं काही काळानंतर हळूच दूर होत जात.
माणसाची मन जशी एकत्रित येतात तशीच ती दूर हि होतात. त्या मागच कारण शोधायला गेल्यास , एक मात्र कळत.
आपण त्यांच्याप्रमाणे वागत नाही , त्याचं मन राखत नाही . काही ना काही कुठेतरी त्यांच्या मनाला छेदून आपण पुढे जात असतो . ते त्यांच्या मनाला पटेनास होत .
सुरवातीला जीव लावणारी , भरभरून प्रेमाचा वर्षाव करणारी व्यक्ती पुढे मात्र काळा ओघाने आपली साधी विचारपूस करणं हि सोडून देते. तेंव्हा उगाच वाटत .
माणसाच्या मनाचा काहीच भरवंसा नाही , ते कधी हि बदलू शकत . परिस्थितीनुसार नि वेळेनुसार, त्यात बदल हा घडत राहतो . तेंव्हा आहे ते स्वीकारायचं हेच हाती रहात. तरीही मन मात्र प्रश्नाच्या अनेक गुंत्यात स्वतःला झोकून देत . आणि त्याचा त्रास काहीसा होत जातो .
काही प्रश्नांची उत्तर मिळतात ती सहज सोडवता हि येतात . पण काही प्रश्न निरुत्तरच राहतात .
मनातलं काही
संकेत पाटेकर

मनातलं काही ...- भाग २


माणसाच्या गर्दीला हि माणूस कधी  कंटाळतो , नकोसं वाटतं  सार त्याला ,
कोणाची जवळीक नि प्रेमं  हि ...मायेचा स्पर्श हि , नको हवी असते स्तुती , नि कौतुकाची थाप हि ...
मनं  मात्र त्याचं, असलेल्या जागेपासून दूर कोसा पर्यंत फडफडत घेऊन जातं.
अन जिथे ते थांबतं. तिथे असतो  निसर्गाचा अद्भुत चमत्कार , अलंकारित  सौंदर्य,  एक वेगळं विश्व ...
महत्वाचं  म्हणजे त्याला हवा असलेला एकांत ......
रोज त्याचं  त्याचं जीवनापासून कुठेतरी दूर जावं  जिथे आपल्याशिवाय कुणीच नाही .
अस प्रत्येक मनाला कधी ना कधी वाटतं .  आणि आपलं  मनं  तिथ पर्यंत आपल्याला घेऊन हि जातं ......
कधी कल्पनाच्या दुनियेतून .. निळ्याशार तरंगमय सौम्य लहरीत, शांत निरागस, चमचमत्या काळोख्या रात्री ..हळूच..त्या तरुतून ...... तर कधी प्रत्यक्ष, वर्तमानातून ...
हवा असतो तो फक्त एकांत ....................
स्वतःसाठी , स्वतःच्या गतीसाठी ..
संकेत य पाटेकर
 १४.०५.२०१३
____________________________________

आयुष्याची व्याख्या  सहज अन साध्या शब्दात देता येते पण तेच आयुष्य त्या व्याख्या नुसार जगणं फारच कठीण असतं . आणि ते फारच कमी लोकांना जमतं.
- संकेत
____________________________________
नात्यातला जवळीकता साधणारा दुवा म्हणजे संवाद.
-संकेत
____________________________________
स्व:ताहाच्या मनावर ताबा मिळविणे हि एक सर्वात मोठी आणि तितकीच अवघड गोष्ट.
-संकेत
____________________________________
दु:खाला सोबती नाही , कुणी त्याचं  भागीदार हि नाही .......ते स्व:ताहाच स्व:ताहालाच पचवावं लागतं ..पेलावं  लागतं.
-संकेत
____________________________________
जोपर्यंत आपले विचार आपण समोरील व्यक्तीला पटवून देत नाही .....तोपर्यंत समोरील व्यक्तीचं  आपल्याबद्दलच मत हे ''आपण दोषी'' असल्यासारख असतं .
-संकेत
____________________________________
आयुष्याच्या प्रत्येक वाटेवर जागो जागी खड्डे ...असतातच.
तिथे आपण ठेच लागून कधी ना कधी पडणारचं  ............पण पडल्याच दु:ख आपणास नसतं  काही .. दु:ख असत ते अशा वेळी सोबत कुणी नसतं  त्याचंच ....
आयुष्य हे अस धडपडतचं  जगावं लागतं  ....स्व: ताहाला सावरतं...
-संकेत
____________________________________
जीवन म्हणजे असंख्य धाग्यांचा एक गुंता...न सुटणारा ..आणि ते असंख्य धागे म्हणजे आपण , हि नाती हे बंधनं आणि सभोवतालची परिस्थिती .
-संकेत
____________________________________
एखाद्या जिवाभावाच्या व्यक्तीच्या नजरेतून आपण पार उतरलो तर पुढे पुन्हा जैसे थे परिस्थिती निर्माण करणं फार कठीण जातं.
-संकेत
____________________________________
ज्यांच्यावर आपण मनापासून प्रेमं  करावं  ते दूर निघून जातात. आणि जे आपल्यावर मनापसून प्रेमं  करतात त्यांच्यापासून आपण दूर निघून जातो .
उरतं  ते काय ते फक्त एकटेपणा आणि एकाकीपण ....
येती माणसं जाती माणसं
लावी जीवाला घोर
प्रेमाजे बीज पेरुनी
होती सारे दूर...
-संकेत
____________________________________
दुराव्यात देखील गोडवा असतो ...पण तो केंव्हा ज्यावेळेस दोघांमध्ये थोड्या प्रमाणात  तरी एकमेकांविषयी प्रेम भावना शिल्लक असते.
-संकेत
____________________________________
दुखाला अंत नसतो ............. सुखही क्षणाचेच सोबती असतात ...!!
-संकेत , मे १७ , २०१२
____________________________________
आयुष्याच्या वाटेवर , वळणावळणावर आपल्यास अनेक माणसे भेटतात , त्यातील काही आपल्या सोबत चालत राहतात तर काही मागेच राहतात पण म्हणून आपण मागे असलेल्यांना कधी विसरायचं नसतं.
-संकेत
____________________________________
आपल्यातले ''कला- गुण'' जोपर्यंत आपण लोकांना (आपल्या कामातून असो वा आपल्या विचार शैलीतून) ते दाखवत नाही तोपर्यंत त्यांना आपले महत्व कळत नाही.
-संकेत
____________________________________
कोणत्याही नात्यातलं दुराव्याचं  मूळ कारण म्हणजे आपल्या अपेक्षाप्रमाणे त्या व्यक्तीने तसं न वागण   ...!! (माणूस हा स्वार्थी असतो)
-संकेत
____________________________________
आवडत्या व्यक्तीचा सहवास आणि प्रेमं  मिळाल्यास ........चेहर्यामागच दु:ख क्षणात नाहीसं  होतं .
पण तोच सहवास ते प्रेम कुठेतरी कमी होत आहे ....लुप्त होत आहे असं जाणवू  लागल्यास त्या अनमोल नात्यातलं अंतर हळू हळू वाढीस लागतं. आणि मग माणसं दुरावतात ...एकमेकांपासून ....!
-संकेत , मे १७ , २०१२
____________________________________
नातं कितीही घट्ट असलं तरी .......त्यामध्ये थोडी स्पेस (SPACE )हि असावीच लागते , अन्यथा शंका-कुशंका ने एक अमूल्य नात्यात तुटातुट होऊ शकते.
-संकेत
____________________________________
प्रत्त्येकाला स्वातंत्र आहे मुक्तपणे हे जीवन जगण्याचा , जीवनाचा पुरे पूर आनंद लुटण्याचा .
असं  आपण म्हणत असलो  तरी , तसं नसतं  , कारण नात्याच्या बंधनात प्रत्त्येकजण अडकलेला असतो. काय बरोबर ना मित्रहो , तुम्हाला काय वाटत माझ्या ह्या विधानाबद्दल ???
____________________________________
योग्य काय आणि अयोग्य काय ? हे माहित असून सुद्धा आपण काहीच कृती करत नाही.
ह्याचाच अर्थ आपल्याला योग्य तो निर्णय घेता येत नाही.
-संकेत
____________________________________
प्रेमाने बोला, प्रेमाने वागा .......तर समोरची व्यक्ती तुमच्याशी प्रेमाने बोलेल ,प्रेमाने वागेल.
-संकेत
____________________________________
आपल्या प्रिय व्यक्तींचं बोलनं सुद्धा...कधी कधी मनावर खूप वार करून जातं.
खर तर असं बोलनं आपल्याला त्यांच्याकडून अपेक्षित नसतं . पण त्यांची ती परिस्थिती अन आलेली ती वेळ '' त्यांच्या कडून अस नकळत वदवून घेते , पण त्याचा '' त्या बोलण्याचा . त्या शब्दांचा परिणाम आपल्यावर नक्कीच होतो. अन आपलं मनं  दुखावलं जातं हे खरं...
-संकेत
____________________________________
प्रेम असं करावं  कि मेल्यावरही .....आपल्यावरील प्रेमामुळे हि धरती अनेकांच्या आसवांनी न्हावून निघेल.  -संकेत
____________________________________
जाता येता माणसांचे चेहरे पहां , निरखून बघा, बरेच काही लपलं असतं  त्या चेहर्यात .....
जे आपल्याला बरंच काही सांगून जातं  ,शिकवून जातं ..जीवनाचं सार त्यात कुठेतर लपलेलं असत.
- संकेत
____________________________________
काही गोष्टी ह्या स्वीकाराव्याच लागतात . त्याला पर्याय हा नसतोच ......!!
- संकेत
____________________________________

प्रत्त्येकाचं  जीवन वेगळ असतं  , प्रत्त्येकालाच दु:ख असतं,
काही लोक मनातले दुख चेहर्यावर आणत नाही,
पण काहींच्या चेहर्यावरूनच मात्र ते सार दिसत असतं .
दुख हे सार्यांनाच आहे,
तरीही मनं  हे आपलं  म्हणत " काश तुझ्या सारखं  जीवन असतं '' तर  फार बरं  झालं  असतं .
पण ज्याचं त्याचं  दुख ज्याला त्यालाच कळतं.
संकेत
____________________________________
जोपर्यंत जबाबदारीचं ओझं   आपल्या  खांद्यावर पडत  नाही.
तोपर्यंत  खऱ्या  जीवनाला  सुरवात  नाही.
जीवन  हे  अनेक  गुंतागुंतीच ,अनेक  शंकां कुशांकांनी , संकटांनी  भरलेलं आहे.
तो गुंता ती संकट सोडविण्याची  कसब  ज्याच्या  जवळ ....तो  जीवन  जगायला  शिकला  अस  समजावं.
- संकेत
___________________________________
मनं स्वतंत्र असलं  तरी ...त्याला  तुरुंगवास  हा  भोगावाच लागतो.
नात्यांच्या गुंफण,  हे बंधन हेच  काय त्याचं  तुरुंगवास...
इथे जामीन नसतो  इथे असते फक्त  शिक्षा जन्म  ठेपेची  '' प्रेमाने  जगायची ,जगविण्याची '
निखळ  ,निर्मळ  प्रेमाने  जीवन आनंदमय करण्याची  ..
- संकेत
___________________________________
चांगले विचार मनात असून सुद्धा उपयोग नाही जोपर्यंत आपण ते प्रत्यक्ष विचार कृतीत उतरवत नाही.
संकेत य. पाटेकर
___________________________________
आपलं  मनं हे  कितीही शुद्ध, निर्मळ, स्वच्छ, प्रामाणिक, सदाचारी असो , आपला चेहरा कधी कधी आपल्याला फसवतो, अडकवतो कुठल्यातरी संकटात.
संकेत य पाटेकर
___________________________________
'नातं' तुटत नाही , तुटतात ती ' मनं' 
अन ती पुन्हा जुळवायला कधी वेळ हवा असतो तर कधी प्रेमाची हलकीशी थाप , अन आपुलकीचे काही उबदार प्रेमळ शब्द ...
कितीही वाद विवाद झाले , रुसवे फुगवे झाले तरी प्रेमाचा एक हलकासा शब्द...
एक हलकसा स्पर्श ' मनातला' सारा राग क्षणात विसरून लावतं.  म्हणून प्रेमाशिवाय नातं नाही .
अन नात्यांशिवाय प्रेम ....
प्रेम जिथे नातं तिथे ....
 संकेत य पाटेकर
४.१२.२०१३
___________________________________

एकदा का माणसं ओळखता आली .........कि जुळलेल्या त्या नात्यामध्ये किती अंतर ठेवायचं  किती नाही ते आपुसकचं  कळत जातं ..
 - संकेत, १२.२०१३
___________________________________

सर्वच तर्क , शंका बरोबर असतातच अस न्हवे , सर्व तर्क शंका चुकीचेच असतात असे हि न्हवे पण त्यातले काही मात्र खरे निघतात हेही खरे .. - संकेत
___________________________________



काही प्रश्न न बोलताच सुटतात , पण काही प्रश्न बोलण्यास भाग पाडतात , तेंव्हाच ते सुटतात - संकेत

__________________________________

नातं कधीही तुटत नाही , तुटतात ती जुळलेली मनं, आणि तुटलेल्या त्या मनाला पुन्हा जुळायला थोडा अवधी हा लागतोच . - संकेत

__________________________________

जीवन म्हणजे ''त्याग'' आहे.
जीवन जगायचं म्हणजे काहीं गोष्टीनचा त्याग हा करावाच लागतो , एक तर स्वताहाच्या हितासाठी किंवा दुसर्याच्या हितासाठी , चांगल्यासाठी ...., स्वताहाच्या मनाला सावरायला लागत. मन बळकट करावं लागत.
कारण एखाद्या गोष्टीचा त्याग म्हणजे दु:ख-वेदना ह्यांचा भरमसाठ साठाच जणू !!
ते पेलायला कणखर मनाची गरज असते .
- संकेत य पाटेकर 
__________________________________

रस्त्याने जाता येता अनेक चेहरे दिसतात. 
कधी हसरे कधी रडवे ...कधी एकदम टवटवीत प्रसन्न ... कधी कुठल्या तरी विचारात बुडालेले ...आयुष्याचा विचार करणारे...
त्या सर्व चेहऱ्यांना पाहून ...मन स्वताहाच स्वताःआशीच मनातल्या मनात पुटपुटत... हे जीवन म्हणजे सुख- दुखाचाच एक मिश्रण आहे ...!!
आपल्या सुखासाठी जो तो धडपडतो ....आसवे गाळतो ..किती काबाडकष्ट कष्ट करतो. केवळ सुखासाठी ....
पण सुख सुद्धा अशी गोष्ट आहे कि ....जी हातात यावी नि निसटून जावी ...!! 
क्षणभर का असेना एक आनंद देऊन जातो तो सुख ...पण आठवणीत कायम कोरले जातात ते सुखद क्षण !!
- संकेत
__________________________________

संधी '' हि कधी - कुठे - कशी अन कोणत्या स्वरूपात येईल ते काही सांगता येत नाही म्हणून नेहमी तत्पर असणे , सावध असणे अन तयारीत असणेच चांगल .
- संकेत य पाटेकर
__________________________________
मित्रहो ,
जोपर्यंत आपल्या कडून मदतीचा हाथ कुणाला स्पर्श होत नाही . तोपर्यंत आपणास माणूस म्हणून म्हणता येणार नाही. कारण
जग चालते ते प्रेमावर
प्रेमळ अशा माणसांवर
माणसातल्या त्या माणुसकीवर ...!!!!
- संकेत
_____________________________________

मनातल्या सर्वच गोष्टी कधी कुणाला share करता येत नाही.
काही गोष्टी आपल्यालाच सहन कराव्या लागतात. मनात ते कायमचेच ठेवावे लागतात.
चेहर्यावरचं  हसू देखील मुद्दाम ठेवावं लागतं  कधी कधी कुणाच्या तरी प्रेमापायी.
 - संकेत
______________________________________

जीवन हे एकाकी असतं.
संघर्षाच...आपणच ते जगायचं असत . लढत लढत पुढे पुढे जायचं असत .
पण जीवन जगात असताना ..आपल्या माता पित्यांचा आशीर्वाद ..मित्राचं सहवास ..त्याचं प्रेम हे असायला लागत. ...प्रेमामुळेच हे जग आहे. प्रेम करा ..प्रेमाने रहा ..प्रेमाने जगा आणि प्रेमाने जगवा ....
या जन्मावर या मरणावर शतदा प्रेम करावे.....
माझ्या वाढ दिवसा निम्मित्त हा प्रेमाचा संदेश..
- संकेत
__________________________________

प्रत्त्येक क्षण हा फार महत्वाचा असतो ...
क्षण हा क्षणा क्षणाला बदलत असतो ...काही व्यक्ती आयुष्यात येतात ..अन लगेच निघून हि जातात.
.पण येन- जाण्यामाधाला जो मधला जो काल असतो..तो आपल्यास विसरता येत नाही .
.कारण त्या मधल्या काळात आपण ..एकत्र भेटतो ...बोलतो ...विचारांची देवान घेवाण करतो ...
एकमेकांचा विश्वास संपादन करतो.....आनंदाने सर्व काही चालत असत ....

पण अचानक त्या व्यक्तीच अस आपल्याला सोडून जाणं  ..त्याचं दूरवर जाणं ...
आपल्या जीवाला लागतं.
त्याच्या त्या गोड अन प्रेमळ आठवणी मध्ये आपण फार फार गुंतलो जातो.

म्हणून मित्रहो प्रत्त्येक क्षण हा प्रेमाने जगा..
क्षणाला आपण थांबवून नाही ठेवू शकत ...
शेवटी त्या गोड अन प्रेमळ आठवणीच राहतात...त्याच जगायला हि शिकवतात
- अनुभवावरून - संकेत
__________________________________
मित्रहो,
गमती जमती मध्ये आपण कुणाची मस्करी करता करता तिचं वादात केंव्हा रुपांतर होत ते कधी कळत नसत .
कुणाची मस्करी करणं ह्याला देखील काही मर्यादा असतात.
मित्रहो' 'मस्करी करताना कुणाच त्याने मन नाही ना आपण दुखवत ह्याच भान जरूर ठेवावं .
तोडन फार सोप असत जोडन फारच कठीण ...नात जोडायला शिकले पाहिजे ..प्रेमान राहायला शिकल पाहिजे.

सुप्रभात..
संकेत
__________________________________
शब्द हे फार धारदार असतात म्हणून ते जरा जपूनच वापरावे ..
एखाद्या व्यक्तीशी बोलत असताना..बोलानाच्या ओघात ..नकळत आपण काही तरी वेगळ बोलून जातो .ज्याचा समोरच्या व्यक्तीच्या मनावर खोलवर परिणाम होतो.....
मग त्याच्या मनात आपल्याविषयक वेगळ मत निर्माण होतं ....मग त्याचा आपल्यालाही त्रास अन समोरच्या त्या व्यक्तीलाही.....!!
- संकेत
__________________________________
जीवनात जितक आनंदाने राहता येईल, हसता येईल, तितक हसत खेळत राहावं ...कारण दुख हे भिंतीवरच्या पालीसारख सदाने आपल्या पाठीवर चिकटलेले असते..आपल्या अवती भोवती ...फिरत असतं.
- संकेत
__________________________________
माणूस वयाने कितीही मोठा होवो......तो प्रेमात अगदी लहान मुलासारखाच असतो....
- संकेत
__________________________________
भविष्याचा विचार करूनच वर्तमानात जगायचे असते ..तरच जीवनाला कुठे अर्थ निर्माण होईल.

-संकेत य. पाटेकर
__________________________________
ज्या व्यक्तीवर आपण सर्वात जास्त अन मनापासून प्रेम करतो..त्या व्यक्तीच्या मनाला लागेल ..टोचेल ..त्रास होईल अस वर्तन हि आपण करतो... पण शेवटी प्रेम ते सगळ काही "माफ" ..
संकेत य पाटेकर
__________________________________

आनंदाचे क्षण हे मोजकेच असतात ...दुख दारात टपलेलाच असतो...त्यामुळे आनंदाचे ते क्षण हृदयात सामावायाचे असतात ..साठवायचे असतात ...तेच क्षण आपल्याला पुढे चेहयावर नकळत हसू आणि रडूही आणतात.
- संकेत य पाटेकर
__________________________________