शनिवार, १९ एप्रिल, २०१४

तुझ्याशी बोलणारे , मायेन आपलंस करणारे तरी आहेत कि रे .....


काल एक प्रसंग असा घडला ....ज्यामुळे मनाचा तोल फारच विस्कटला..
जिथे गेलो होतो त्याघरी मायेचं अन प्रेमळ मनाचं पाठबळ मिळालं.
 (माझ्या त्या दोन बहिणी अन मावशी )...त्यामुळे सावरलो ..काही वेळेतच ..!

आयुष्यात बरीच अशी माणसे भेटतात ...पण त्यातलीच काहीच अगदी जिवाभावाची बनतात ...
जिथे प्रेम अन मायेचं , आपलेपनाच खर खुर दर्शन घडतं. .... मी स्वतःला भाग्यवान समजतो अशी माणसं लाभलेत .
-------------------------------------------------------------------------------
ऑफिस मधून घरी परतत असता ...रस्ता ठिकाणी रोज एक व्यक्ती दिसते .
अंगावर फाटके तुटके मळके कपडे असलेली , केसांची जठा झालेली . एका ठिकाणी रस्त्याच्या कडेला निवांत पडून असते ... त्या व्यक्तीला पाहून क्षणभर विचार मनात घोळू लागतो.
ह्या व्यक्तीला मायेचं अस कुणीच नाही , कुणी आपुलकीनं विचारणार हि नाही , कशी जगत असेल हि व्यक्ती,  तेंव्हा प्रेम प्रेम करत असलेल मन , प्रेमासाठी धडपडत असलेल मन म्हणत अरे बघ तिथे त्याकडे ....
कुणीच नाही रे त्याचं.. तुझ्याशी बोलणारे , मायेन आपलंस करणारे तरी आहेत कि रे .....
-संकेत य पाटेकर
 ०५.०२.२०१४
मनातले काही...

जगावं कस हे ह्या निसर्गा कडून शिकावं....


जगावं कसं हे ह्या 'निसर्गाकडून' शिकावं. काही न मागता भरभरून देणे हि त्याची खासियत ..
आनंदाची व्याख्या शिकावी हि त्याच्याकडूनच . त्याच्यासारखं 'मित्र' होतां आलं तर 'ग्रेटच' म्हणा , 
कारण एकमेव असा हा मित्र आहे . 
ज्याच्या सहवासात दुखाचा भला मोठा डोंगर हि क्षणार्थात कोसळून पडतो . 
अन चैतन्याचा नवा स्वर अवतीभोवती सतत गुंजत राहतो. 
- संकेत य पाटेकर

मंगळवार, १५ एप्रिल, २०१४

नात्यातील वाद विवाद..

नातं कुठलही असो त्यात वाद -विवाद हे होतंच असतात . रुसवे फुगवे होतच राहतात .
पण इतकं असूनही नात्यातली असलेली ती गोडी काही कमी होत नाही . एकमेकांच एकमेकांवर असलेलं प्रेम काही कमी होत नाही.  बस्स मन तुटली जातात काही वेळा पुरत . तेंव्हापुरतं  सार काही दुरावतं.
तेंव्हा मात्र थोडा अवधी हवा असतो आपल्याला अन समोरच्याला हि सर्वकाही शांत होण्यासाठी, पुन्हा सर्वसुरळीत होण्यासाठी ...तो एकदा दिला, एकमेकांना कि ..बस्स...
पुढेचे क्षण आपलेच असतात .. त्याच गोडीचे ..त्याच हसऱ्या मनाचे ...प्रेमाचे ...आनंदाचे !
असंच लिहिता लिहिता..
-संकेत य पाटेकर
१५.०४.२०१४
 __________________________________________________________________
ज्या व्यक्तीवर आपलं भरभरून अन जीवापाड प्रेम असतं.
 त्या व्यक्तीला विनाकरण त्रास देण्याचं , तसा विचारच आपल्या मनास कधी शिवत नाही .
 उलट ती व्यक्ती नित्य नेहमी हास्य आनंदात बहरली जावी ह्या साठीच , ह्या कडेच आपल्या मनाचा सर्व कल असतो . आणि त्या साठीच सदा सर्वदा त्या ईश्वराकडे एकच मनोभावे प्रार्थना केली जाते ......

ती हि कि तिला सुखी ठेव ....आनंदी ठेव ..भरभरून प्रेम दे !!!
दूर राहूनही ती व्यक्ती मनाच्या अन हृदयाच्या खूप खूप जवळ असते , अन त्याची जाणीव प्रत्येक क्षणी आपणास होत राहते . 
हेच ते प्रेम असत. .... हेच एक अनमोल नातं असतं...
मनातले काही ..
- संकेत
 ०२-०५-२०१३
हा फोटो नेट वरून घेतलेला आहे

रविवार, १३ एप्रिल, २०१४

१०० वर्ष आयुष्य आहे तुला....


१०० वर्ष आयुष्य आहे तुला ..........आत्ताच तुझी आठवण काढली .
सहज कधी , योगा योगाने म्हणा किंव्हा ठरवून म्हणा , एखाद दिवशी कधीतरी अचानकपणे भेट घडते. नेहमीच्याच कट्ट्यावर तर कधी रस्त्याने जाता येता ...कधी कुठल्या एका कार्यक्रमाप्रसंगी , मग तो लग्न समारंभ असो वा इतर कुठला हि ....
एकमेकांना भेटून खुशालकि विचारली जाते .
मग विषयावर विषय निघत एक एक विषय चर्चिले जातात .
गप्पांना हास्याचा आनंदी रंग चढत जातो. मग सरतेशेवटी किव्हा अधे मध्ये एखाद दुसर्या मित्राची किंव्हा आपल्या लाडक्या व्यक्तीची आवर्जून आठवण येते.
तिचा उल्लेख हि होतो .
काय करतो रे तो हल्ली ? कुठे असतो तो ? दिसतो का , भेटतो का ? 
कशी आहे ती ? बरेच दिवस दिसली नाही . असे प्रश्ना वर प्रश्न विचारले जातात .
अन त्या प्रश्नाच उत्तर देण्यास जावे तोच ती व्यक्ती साक्षात देवासारखी तिथे अवतरलेली असते .
अन मग नकळत एक वाक्य निघत मुखातून ...जे सर्व श्रुत आहे.
ते म्हणजे ..
१०० वर्ष आयुष्य आहे तुला ..........आत्ताच तुझी आठवण काढली .
असे क्षण प्रत्येकाच्या आयुष्यात येतात. 
कधी आपण कुणाला १०० वर्ष बहाल करतो , तर कधी आपले जिवलग आपल्याला १०० वर्ष बहाल करतात अगदी प्रेमाने आपण मात्र एक हास्य छबी देऊन मोकळे होतो.
संकेत य . पाटेकर
१६.०२.२०१३

' आठवणी '


ह्या फोटोंच बर असतं. ते कधी पहा, ..कुठे हि पहा ...
त्यातले चेहरे बदलत नाही. चेहर्या वरचे हाव भाव बदलत नाही. त्या व्यक्ती बदलत नाही .
जे आहे ते आहे वर्षानुवर्ष तसच...बदल अजिबात नाही .

म्हणून ते पाहताना ........गेलेले क्षण पुन्हा तसेच्या तशे नजरे समोर येतात .
 अन आपण त्या हसर्या आठवणीत आपलं भान हरपून घेतो.  मन स्वतःशीच प्रश्नोत्तराच खेळ खेळू लागतो.
किती हसरे क्षण होते ना ते ? किती सोनेरी दिवस होते ? काश ते दिवस ते क्षण पुन्हा बहरून आले तर...

 पण ह्या जर अन तर च्या गोष्टी, कारण आपण वेळेसोबत पुढे आलेलो असतो .

काल बदलला असतो. परिश्तिती बदलेली असते. व्यक्ती व्यक्ती बदलेल्या असतात.  पण आठवणी ह्या अश्याच अजूनही ताज्या टवटवीत ...

मनाला प्रसन्न्तेचा लेप देत असतात.
संकेत पाटेकर
२१.०२.२०१४

आपल्या माणसाच 'मन '


म्हणतात , प्रेमाने जग जिंकता येतं , पण मला जग जिंकायचं नाही. 

आपल्या माणसाच ' मन ' जिंकायचं आहे , भले आज मी त्यात हरलो , अपयशी झालो . 
ह्या घडीला मला त्यांचं मन नाही जिंकता आलं , पण एक ना एक दिवस माझा येइलच . 
तेंव्हा त्यांना अभिमान हि असेल . 
स्वतःचा अन स्वतःबरोबर माझा हि , तेवढी मी खात्री देतो . 

 संकेत य. पाटेकर 
 ०३.०३.२०१४

म्हणून बोलावं मनमोकळेपणाने....


मनात जे असेल ते बोलून टाकावं एकदाचं ...मनात काही ठेवू नये , व्हायचा त्रास तो होऊ दे, एकमेकांना , 
जो काही व्हायचा तो एकदाच ....पण त्याची पुन्हा पुन्हा उजळणी नको . तेच.. तेच अन  तेच तेच...
मनाला तोच तोच विचार करण्यास भाग पाडून अस खिचपत पडण्यापेक्षा ..बोलावं..
मन मोकळेपणानं त्यातून काहीतरी मार्ग निघेल.....हव्या असलेल्या प्रश्नाच उत्तर तरी मिळेल.
पण असं एकटक शांत राहून .. एकमेकांशी न बोलताच ...मनातल्या मनात प्रश्नांची जर उजळणी करत राहिलो . तर एक एक दिवस ...जगण फार अवघड होउन जाईल . 
अश्याने त्रासा शिवाय इतर काही गवसणार नाही. इतर कुठल्याच गोष्टीत मन रमणार नाही. 
आहे ते प्रश्न सुटणार नाही. त्याच उत्तर मिळणार नाही... 
म्हणून बोलावं मनमोकळेपणाने ज्याने त्याने ......यायचा राग तो येऊ दे एकदाचं ...!
तो काही क्षणासाठीच असेल ...
पण कदाचित प्रश्नाचं उत्तर मिळेल . पुढचं जीवन सुखरूप होईल. 
आपलं मन हलक होईल.
- संकेत य पाटेकर
१८.०३.२०१४

शनिवार, १२ एप्रिल, २०१४

प्रवास ...

प्रवास कुठलाही असो , कुठे हि असो , कधी हि असो...दिवसा असो वा रात्री असो . 
स्वप्नातल्या लखलखत्या चंदेरी दुनियेतला असो , पायी असो वा चार पायी असो, मुंबईतल्या धावत्या रेल्वे गाडीतला असो .रस्त्यावरल्या गजबजल्या रह्दारीतला असो, एकटक एकांतातला असो , भोवतालच्या निसर्गरम्य परिसरातला असो कि दूर दुरल्या खेड्या पाड्यातल्या , शेंता बांधातला असो . तलावकाठी फुललेल्या सांजवेळीतला असो वा गावागावातल्या गल्लीबोलीतला असो..सह्याद्रीतल्या बळकट दुर्ग राशींवर असो वा सर्वोच्च उंच शिखरावर असो . पुस्तकी दुनियेतला असो , वा काव्यातून नटलेला असो...
प्रवास आनंद देतो . प्रवास नवी उर्जा देतो , नवी प्रेरणा देतो , जगण्याची नवी आशा देतो . 
लढण्याची नवी शक्ती देतो. नवं आत्मज्ञान देतो . हास्य देतो . मायेच स्पर्श हि देतो त्याबरोबर वेदनेचे चटके हि देऊन जातो.
तो घडवतो .शिकवतो , एक विशिष्ट्य आकार देतो आपल्या विचारांना ... नव्या उद्दिष्टांसह , नव्या ध्येया सह..

असा हा आनंद - दुख मिश्रित 'जीवन प्रवास ' हा प्रवासच म्हणजे जीवन नाही का ?
आईच्या पोटी ९ महिने काढल्या नंतर ह्या नव्या जगाशी आपला थेट संबंध जुळतो .
इथूनच आपला मार्ग सुरु होतो . आत्मसात करण्याची अन शिकण्याची मानवी वृत्ती आपल्याला हळूहळू घडवत जाते .
कधी हास्यात कधी दुख वेद्नानाच्या आसवात.......आपण घडतो.
धडपडतो , उठतो , शिकतो ..अन चालत राहतो. आपल्या जीवन वाटेवर...

हाच तो प्रवास असतो ..आपल्या ध्येयाशी जुळलेला .
तर ह्या अश्या प्रवसात काही गमती जमती नक्कीच घडतात ..तर काही गोष्टी मनाला भेदून जातात .
 त्याच इथे मी मांडण्याचा प्रयत्न करणार आहे .
लवकरच ................
संकेत य पाटेकर
०९.०४.२०१४

______________________________________________________
कालचीच घटना ..
मामाच्या मुलाचं लग्न सोहळा आटपून गावाकडून सायंकाळी पाच च्या सुमारास बाहेर पडलो...परतीच्या प्रवासाठी . पुन्हा त्या कोन्क्रीटी करणाच्या धावत्या शहरात ... जिथे वेळेला हि घाम फुटतो ....कारण ती हि सतत धावत असते . कुणाची पर्वा न करता .. 

खर तर गावातल्या मोकळ्या वातावरणातून पुन्हा त्या प्रदूषणयुक्त धावपळीच्या वातावरणात प्रवेश करन नकोस वाटत होतं .
पण काय करणार ...जिथून आलो आहे तिथे परतावं तर लागतंच ना .
मग ते आपलं घर असो . वा यमदूताच घर ..घर हे घर ...ह्या भूतलावरच अन नंतर मृत्युला कवटाळन्या नंतर...यमाच ...जिथून आलोय तिथे पुन्हा जावंच लागतं .
 तर असो ..
आनंद हा तसा क्षणाचा सोबती असतो. पण तो का एकदा अंगात भिनभिनला कि सदा साथ देतो .
अन अशी आनंदाने भिनभिनलेली हसरी माणसं आपल्याला , 
आपल्या सभोवताली कुठे ना कुठे भेटतच असतात .
असो...
लग्न हा तसा सुख दुखाचा आनंदमय सोहळा . दोन जीवांना एकत्रित करणारा ...
एकमेकांना आयुष्यभर साथ देण्याची वचनं घेऊन अग्नी भोवती सात फेरे घेण्याचा हा सोहळा..
आसवांचा पाट नकळत ओसंडून वाहणारा हां सोहळा..
आनंदात मौज मस्तीत मुक्त न्हाउन घेण्याचा हा सोहळा ..
साखरपुड्य़ाला सुपारी फोडेपासुन हळद अन लग्ना पर्यंतचा विविध विधींचा हा सोहळा .
तर असा सोहळ्याला साक्षी राहून ..मी निघालो दुसर्या दिवशी घरातून पुन्हा घराकडे ...
गावाकडून शहराकडे ...परळी ते खोपोली. ३ चाकी टमटममधून...
सायंकाळचे ६:१५ झाले होते. परळी तून खोपली फाट्याजवळ उतरलो .
खोपली तून ६ ला सुटणारी मुंबई लोकल आता भेटणारी न्हवती .
त्यामुळे फाट्याजवळच उतरून हात दाखवून पनवेल करिता अथवा ठाण्याकरिता एखादी एस टी किंव्हा दुसरी कुठली चार चाकी मिळते का ते पाहत होतो.  तेवढ्यात एक काळ्या रंगाची करकरीत फोर्ड गाडी रस्त्याच्या कडेला येउन थांबली.
माझ्या बाजूला उभ्या असलेल्या २ स्त्रिया अन एक वयस्कर काका त्या गाडीत जावून बसले .
मी त्यांच्याकडे टकमक पाहत राहिलो. अन विचार करू लागलो. असतील ओळखीचेच कुणीतरी..
म्हणून बसले असतील गाडीत.. आपलं नशीब कुठल थोरं...
आपल्याला दुसर कुठल वाहन मिळत का ते पाहत उभं राहावं लागेल . ..म्हणून आहे तिथेच उभा राहिलो. तेवढ्यात पनवेल का ? अशी गोड हाक कानी ऐकू आली .
नजर त्या स्वराचा मागोवा घेत त्या काळ्या रंगाच्या फोर्ड गाडीकडे वळली.
 आत बसलेली ती जेमतेम ४० च्या आसपासची स्त्री . मला विचारात होती .
पनवेल का ? मी म्हटल हो . अन बसा म्हणून मला त्यांनी जागा दिली .
 पुण्यावरून आलेली ती गाडी आम्हा अनोळख्यांना घेऊन अशी पनवेल च्या दिशेने धावू लागली.
 सुरवातीला वाटलं ती माणसं वाहन चालकाच्या ओळखीचे असावेत . पण तसं काही न्हवतं.
कुणीच कुणाच ओळखीच न्हवतं . पण माणुसकीच्या नात्याने आम्ही काही वेळासाठी हि का असो एकत्रित आलो होतो. अन त्यातून विचारांची देवाण घेवाण ला सुरवात झाली होती . एखादी हसरी अन बोलक्या व्यक्तीमत्वाची माणसं भेटली कि गप्पांना अन वेगवेगळ्या विषयानां उकळी फुटते . मग ऐकणारा शब्द ना शब्द ऐकत जातो . बोलणारा बोलत राहतो. . विचारांची अशी देवान घेवाण होत राहते . त्यातून कधी काही प्रेरणादायी वाक्य बाहेर पडतात. अन ते वाक्य आपल्या जीवनाला काहींदा कलाटणी हि देऊन जातात . 

 पनवेल ला उतरायचं म्हणून गाडीत बसलो खरा ..पण उतरलो ते थेट शीळफाट्याजवळ . ..
ते हि एक पैसा न घेता आणि महत्वाच म्हणजे येता येता आलो ते प्रेरणादायी वाक्य कानी ऐकतच .
 गाडीचे चालक मालक ' मुकुंद कुलकर्णी '' ह्यांच्या जीवनातले अनुभवी बोल.
गरीबलाच गरीबाची अन आपल्या सभोवताली घडणार्या बारीक सारीक गोष्टींची जान असते. 
 जीवनामध्ये चढ उतार असतातच . त्याना सामोरे जा . पडा धडपडा ..पण पुन्हा उभे रहा . प्रामाणिक रहा . जे काम करत आहात ते मनापासून करा ...शिका ..शिकत रहा . 
मला हे जमणार नाही जमत नाही . अस कधी करू नका . स्वतःवर विश्वास ठेवा .  जिथे प्रेरणादायी वातावरण असेल त्या वातावरणातच प्रवेश करा . 

अन त्यातून प्रेरणा घ्या त्यांनी एक उदाहरण दिल . 

कोल्हापूर वरून आलेला एक बारावी झालेला व्यक्ती , शिपाई म्हणून नोकरीला लागतोय काय अन पाच करोडचा BUSINESS करतो काय काय ....अचंबा करणारी गोष्ट आहे .
अफाट मेहनत अन बुद्धीची जोरावर अन शिकत शिकत तो इथवर पोहचला .  अशी काही उदाहरणे देत त्यांनी ते प्रवासाचे काही क्षण अगदी भारावून टाकले .
जाता जाता मलाच THANKU म्हणतं...
म्हणून प्रवास मला आवडतो . तो घडवतो शिकवतो , प्रेरणा देतो . नवी ओळख देतो .
 स्वताची .अन जगाची हि ..
कोण कुठे कसा कधी भेटेल अन आपल्याला MOTIVATE करेल यशस्वी जीवनाकरिता ते सांगता येत नाही . पण ती भेट अविस्मरणीय असते .
- संकेत य पाटेकर
५.०५.२०१४




जीवन एक... प्रवास आहे .
कालचा पुढचा मागचा आत्ताचा , येणार्या उद्याचा , संघर्षाचा , आनंदाचा ..लढून ताठ मानेने अभिमाने जगण्याचा. माझ्या जीवन प्रवासातील अशाच रंजक अन हृदयास भिडणार्या काही आठवणी काही क्षण मी तुमच्या पुढे मांडण्याचा प्रयत्न करतोय. त्यातलीच हि एक कालची घटना हृदयास भिडलेली .
' लढा जीवनाशी ...जगण्यासाठी '
सायंकाळी सहाचा न ऐकू येणारा पण डोळ्यांना उभ्या रेषेत दिसणारा घड्याळी टोला वाजला.
 तेंव्हा ऑफिस मधून निघालो. घाई घाईत पायी पायी नेहमीप्रमाणे , डांबरी अन कोन्क्रिट करणाच्या पायवाटेने , कडेकडेने २०-२५ एक मिनिटात थेट अंधेरी स्टेशन गाठले. पुढे चर्चगेट साठी ट्रेन पकडून घामाच्या धारांच्या संगतीने भर गर्दीतून दादर ला पाय उतार झालो.
अन पश्चिमेकडून कडून पूर्वे कडे धावत पळत ७:०१ ची कल्याण लोकल ट्रेन साठी platform क्रमांक ५ वर र एका ठिकाणी रेंगाळत उभा राहिलो.
तोच अन तेवढ्यात नजर एका बाप लेकाच्या जोडी कडे वळली. (खर तर बाप , हा शब्द मी कधी उच्चारात नाही . पण इथे ते देन गरजेच वाटलं म्हणून लिहितोय ) तर माझ्या शेजारीच अगदी platform वर त्या दोघांनी बैठक मारली.
 साधरण सात एक वर्षाचा तो मुलगा अन त्याचे चाळीशीच्या पुढे झुकलेले पप्पा .
 आपल्या लेकाकडे किती आत्मीयतेने पाहत होते. अन बाप लेकाच ते करुणामय चित्र मी अगदी स्तब्ध नजरेने न्हाहाळत होतो. लोकांच्या प्रश्नार्थी नजरा हि त्यांच्याकडे अधून मधून पडत होत्या .
पण त्या दुरूनच .
प्रश्न पडायला कारण हि तसच होत. त्या लहानग्याच्या तोंडावर मास्क लावलेला .
डोक्यावरचे त्याचे केस फारच विरळ झालेले त्यामुळे डोक्यावरची त्वचा अन त्वचा दुरूनही नजरेस दिसून येत होती. अन त्यातच त्या मुलाच्या पप्पा कडे असलेला बगेतील औषधी गोळ्याचा साठा काहीतरी गंभीर आजार असल्याचा दाखला देत होता . 
मी हि ट्रेन ची वाट पाहत त्यांच्या बाजूलाच उभा होतो. त्यांच्याकडे पाहत होतो.
 मनात एकप्रकारे प्रश्नाचं काहूर हि माजलेल. तो औषधी साठा अन त्या लहानग्याला पाहून , नक्की काय आजार असावा ? कॅन्सर सारखा गंभीर आजार तर नसावा ना ?
पण इतक्या लहान मुलाला कॅन्सर कसा होईल . छे, छे ..अजिबात नाही .
 मनात अशा रीतीने माझ्या द्वंद्व सार चालू होतं.
तेवढ्यात त्या मुलाच्या पप्पाने बगेतील औषधाची बिलं काढून अन एकदा स्वताहा चालून माझ्याकडे सुपूर्द केली. , प्रश्नार्थी नजरेने उत्तराच्या अपेक्षातच .
नक्की खर्च झालेला आकडा किती ? ह्या विवंचेत.
हे किती आहे ? त्यांनी माझ्याकडे दिलेल्या बिल कडे बोट दर्शवून मला विचारले ?
हे दीड हजार आहेत अन हे साडे चार हजार , म्हणजे एकूण सहा हजार .
आहे ती आकडे बेरीज करून मी त्यांना सांगितली.
 त्यांनी पुन्हा दुसरं अन तिसरं असं एक एक बिल माझ्याकडे सुपूर्द केलं. त्याचा आकडा हि मी त्यांना सांगितला .  अन त्या सगळ्याची बेरीज करून साडे सात हजार हा आकडा समोर आला . ते समजताच त्यांनी हसतच त्यांच्या डोक्यावर हात ठेवला .
 अन माझ्याकडे पाहून म्हटल .  एका दिवसाचा खर्च ..साडेसात हजार.
मी त्यावर काही बोललो नाही . बस्स स्मित हास्य केलं .
अन प्रश्नार्थी नजरेने पुन्हा त्यांचाकडे अन त्या मुलाकडे पाहू लागलो नक्की काय झालं असेल ?
कसला आजार झाला असेल ? कुठून आले ते ?
असे एक एक प्रश्न मनात एखाद्या वादळीचक्रा प्रमाणे फिरत होते.
म्हणून एकदाच त्यांना विचारल ? काय झाले आहे त्याला ?
 त्यांनी एकवार माझ्याकडे पाहिलं . अन म्हटलं

'' कॅन्सर '' 

ते ऐकून क्षणभर धक्काच बसला .
इतक्या लहान मुलाला कॅन्सर ? कस शक्य आहे ? देवा काय हे ? अजून कळी उमलली नाही तर असा गंभीर आजार...काय केलाय त्याने गुन्हा ?
 पण ते होतं. इवलास वय अन ............ क्षणभर त्यांच्याशी काय बोलावं ते कळत न्हवतं .
त्यांचा मुलगा आपल्या पप्पांच्या मोबाईल वरून आपल्या आईशी संवाद साधत होता . अगदी मोकळेपणाने आपल्या लाडल्या आईशी तो गप्पांत गुंग झाला होता .
' ये आये , आम्ही बारा पर्यंत पोचू बर घरी '
त्याचे त्याचे ते गोड बोबडे बोल अन निरागस हास्य मुकुट माझ्या मनाला मात्र घाव देत होते.
 काय आयुष्य आहे . अजून सुरु हि नाही झालं . तर ....... त्या मुलाला तरी काय कल्पना ...
आपल्याला नक्की काय झालाय .
हुशार आहे हो तो, पण काय ......
त्यांनी एकवार माझ्याकडे पाहिलं ..पण त्यांना पुढे बोलवेना .
तरीही ..'' बरा झालाय तो'' अस म्हणत ते , प्रेमळ आसवांनी आपल्यामुलाकडे पाहताच राहिले.
नाशिक चे ते स्थायिक . गेले तीन महिन्यापासून परेल च्या टाटा मेमोरिअल हॉस्पिटल मध्ये आपल्या मुलावर उपचार घेत आहेत.
आपल्याला झेपेल तसं ते करतायेत आपल्या मुलासाठी. . कसं जीवन असत एकेकाच .

जो तो लढतोय जीवनाशी . संघर्ष करतोय . कुणी आपल्या जन्मापासून तर कुणी जीवनाच्या अर्ध्या वाटेवर पोहोचल्यावर तर कुणी कधी ... पण संघर्ष आहेच . जीवनाचा जगण्यासठी ....
प्रवास ..... घटना ३
संकेत य पाटेकर
०९.०५.२०१४

























No one has ever become poor by giving ...
वार रविवार आपल्या हक्काचा सुट्टीचा दिवस . दिवस भर आराम करून संध्याकाळच्या वेळेस सहज फेरफटका मारावा म्हणून घराबाहेर पडलो .
दुर्तफा झाडींनी अन फुलांनी बहरलेल्या त्या डांबरी रस्त्यातून ..कडे कडेने ..मनात बहरलेले विचार घेऊन ...भविष्याचा वेध घेत . पाउला पाउलानिशि पुढे जात होतो .
तेवढ्यात कुठेशी नजरा नजर झाली.
 रस्त्या पलीकडल्या त्या ' बाई' भुकेच्या व्याकुळतेने केविलवाण्या चेहऱ्याने माझ्या जवळ आल्या .
अन १०- २० रुपये मिळतील का ? भूख लागले ? अस म्हणत माझ्याकडे हात पसरू लागल्या .
जेमतेम ४०-४५ च्या आसपासच्या नववारी साडी नेसलेल्या त्या बाई पेह्रावरून अन दिसण्यावरून तरी धडधाकट दिसत होत्या .
हल्ली भिख मागण हा देखील धंदा झालाय.
त्यामुळे पैसे काढून द्यावे कि नको ह्या विचारात मी होतो. तसे दहा - वीस रुपये द्याला काही मोठे न्हवते . पण म्हटल त्याआधी तीला विचारुया कुठून आलात ? इथे कश्या ?
आणि भिख का म्हणून मागत आहात ?
तेवढ्याच २ गोष्टी समजतील त्यांच्या जीवनातल्या . म्हणून विचारायला लागलो.
तेंव्हां ती बोलू लागली.
अकोल्या वरून आले . बहिणीसोबत इथेच राहते ..मिस्तर आहेत पण ते साईट वर आहेत त्यांचा फोन लागत नाही.अस तसं..
 माझ्या मनाला मात्र जे तिने सांगितल ते कुणास ठाऊक पटल नाही.
मी मनाशी काहीस ठरवून पैसे न देता..त्यांना sorry म्हणत पुढे निघालो . 
पण मनातली हि विचारांची धारा काही स्थिर राहत न्हवती. रस्त्याने चालत होतो पण मन स्वस्थ बसत न्हवतं .
' मन' च मनास प्रश्न करत होतं .
 काही क्षणाच्या भेटीवर अन कोणत्या विश्वासावर ती तुला तिच्या जीवनातले सर्व गोष्टी सांगत बसेल ?
१०-२ रुपये दिले असते तर काही बिघडल असतं का ? अरे कालच एक वाक्य वाचलंस ना रे ...
No one has ever become poor by giving ...मग का ?
का दिले नाहीस पैसे ? दहा वीस रुपयाने तुझ काही कमी होणार आहे का ?
 इतकं हि तुझं जीवन फाटकं नाही ? चल मागे फिर ..जा पुन्हा त्या बाई कडे ?
दुसर्याच्या आनंदातच आपला आनंद असे मानतोस?
 मग एखाद्याने जर आपल्याकडे काही मागितल अन ते देण्यास आपण सक्षम असू ?
मग ते का देऊ नये ? अरे पण ? कोणालाही अस द्याव ?
उगाच, काही एक कष्ट न घेता आयात अस मिळतंय म्हणून, भिख मागावी का ?
पण दुसर मन हे मानण्यास तयार होईना ... एकच वाक्य ..सतत उमटे मनाच्या अंतरीतून
No one has ever become poor by giving .....
रस्त्याच्या एका वळणावर पाउल थबकली . मी मागे फिरलो . पुन्हा त्याच दिशेने .... नजर इकडे तिकडे वळविली . पण वेळ निघून गेली होती. पुन्हा न परतण्यासाठी...
 एव्हाना त्या बाई दूर निघून गेल्या होत्या ...त्यांच्या वाटेने .. मी मात्र शोधार्ती नजरेने मनाशी एकच वाक्य पुटपुटत होतो.
No one has ever become poor by giving .....
प्रेम असो वा प्रेमळ शब्द वा मायेचा हलका स्पर्श वा इतर गोष्टी मग पैसा असो वा आपली मदत . 
आपल्याने जर एखाद्याच्या चेहऱ्यावर हास्य फुलत असेल तर ते जरूर करावे .
-संकेत य पाटेकर
१९.०५.२०१४

ते बहरलेलं झाड..

नित्य नेहमीचीच ठरलेली जागा आमची , दुपारचा साडेबाराचा आकडी टोला पडला कि कॅन्टीन मध्ये पळत सुटायचं .
घरातून दिलेलं पोळी भाजीचा प्रसाद एक एक करत पोटात टाकयचा अन मग फेरफटका म्हणून मोकळ्या वातारणात , मोकळा श्वास घेण्यास ऑफिस बाहेरील वृक्ष वेलींच्या दाट छायेत थोडं विसावायच.

आपण एकटाच असू तर निसर्गातल्या त्या विवध खट्याळ गमती जमाती डोळ्यांदेखत पाहायच्या . अन पुन्हा काही वेळत ऑफिस मध्ये परतून आपल्या कामांत स्वाताहाला वाहवून घ्यायचं .
हे नित्य नेहमीचंच ठरलेलं माझं .
निसर्गाच्या सानिध्यात मनाला जी प्रसन्नता मिळते . ती इतरत्र कोठूनही मिळणार नाही .
काही दिवसांपूर्वी च ते पानागलेलं झाड आज चक्क बहरून निघालंय.
मोहर फुललाय म्हणायचा . त्यामुळे विविधरंगी पक्षी पाखरांचा मेळावा त्याच्या अंगा खांद्यावर वाऱ्याच्या सुरेल स्वरात अगदी इकडून तिकडे झुळत असतो.
कधी एखादा दयाळ , तर कधी पिसारा फुलवून नाचणारा ' नाचरा' , कधी विटू विटू करणारा मिठास पोपट , तर कधी चिऊताई पेक्षा हि अगदीच लहान इवलासा पक्षी आपलं गोंडस दर्शन घडवतं .
त्यांचे विविध नखरे नजरेत टिपून घ्यावीत अशीच असतात . त्यातच आपल्या कावळ्या चिमण्याच्या येरझारया होत असतात. मधेच एखादा कोकिळ पानांच्या सळसळत्या लाटेत स्वतःला लपवत आपल्या सुरेल स्वरात गाऊ लागतो.
इवलीशी खारुताई सतर्क नजरेने ह्या फांदीवरून त्या फांदीवर '' मीच इथली राणी '' म्हणत मोठ्या दिमाइक्तेने शेपूट झुलवत बागडत असते .
फुलपाखरे आपल्या विविधरंगी कलात्मक छटा पसरून इथल्या सौंदर्यात अजून भरणा घालत असतात .
झाडाच्या अवतीभोवती मुळाशी पसरलेल्या मातीत किडे मुंग्या आपल्या नेमून दिलेल्या कामात सतत व्यस्त असलेले दिसून येतात.
 फुलांचा सडा सर्वत्र पसरलेला दिसून येतो , त्याचा सुगंध दरवळत असतो एक आल्हादायक वातावरण असत ते ......मनाला रीफ्रेश करणारं ..!
निसर्ग हा अद्भुत आहे रहस्यमय आहे . तितकाच लावण्यमय सौंदर्याने नटलेला देखील. 
ज्ञानार्जनाने समृद्ध असा , अफाट शक्तीचा , ममत्वेने परिपूर्ण हि ... 
अश्या ह्या निसर्गात त्याच्याशी गुजगोष्टी करण्यात , त्याच्या सहवासात स्वतःला हरवून घेण्यास मला खूपच आवडतं. त्याच्यासारखा गुरु नाही .
 कोणतही मानधन न घेता बर्याच गोष्टीच शिकवतो .
असंच लिहिता लिहिता ..
- संकेत य पाटेकर
११.०४.२०१४
* खालील फोटो हा अंतरजालातून घेतलेला आहे हे वाचकांनी ध्यानी घ्यावे . _______________________________________________________________
आज त्याची माझी चक्क दुसरी भेट <<<<
तेही कित्येक दिवसाने घडली ..तेच ठिकाण , तीच वेळ ... पहिल्यांदा जेंव्हा तो भेटला होता , तेंव्हा किती आनंद झाला होता सांगू , एखाद्या गोष्टी विषयी अति उत्सुकतेने अन कुतूहलाने वाचावं अन ते अप्रत्यक्षरित्या अचानकपणे डोळ्यासमोर उभ रहाव, ह्यात किती तो आनंद ......शब्दात वर्णन करता येणार नाही.
तांबट दिसायला तसा फारच सुंदर ...अन तितकाच धीट हि , हाकेच्या अंतरावर मी त्याची सुरु असलेली कसरत पाहत उभा होतो . ते हि दहा पंधरा मिनिटे , अन तो हि न डगमगता आपल्या कामात अगदी तल्लीन झाला होता. एखाद्या पक्षाच घरट आपल्या डोळ्यादेखतं आकार घेताना पाहणं  , किती नाविन्यपूर्ण अन भाग्यातली गोष्ट नाही का ? ते भाग्य मला लाभलं हो आज ..थोड्या अवधीसाठी का होईना ....
आनंदी आनंद गडे..
मागची त्याची पहिली भेट घरट्यासाठी जागा पाहण्यात गेली.
आणि ती त्याने निवडली हि . अन आज चक्क तो आपल्या बळकट चोचीचे दणके देतं.
घरट्य़ास आकार देऊ पाहत होता . पंघांची फडफड करत तो कधी हवेत तरंगत ,तर कधी एका पायवर उभा राहतं , घरट्य़ा ठिकाणी फांदीवर चोचीचा प्रहार करत . अधे मध्ये थोडा विसावा घेत . अन पुन्हा काम चालू करत . वाटावं कि असंच तिथे उभ राहावं त्याची ती कारागिरी पाहत ...
पण ऑफिस ची ' लंच ब्रेक' ची वेळ घटत आल्याने , नाईलाजाने पुन्हा परतावं लागलं
एक चांगल आहे , ऑफिस च्या आसपास झाड्यांची बहरलेली बाग असल्याने , दुपारच्या मधल्या सुट्टीत जेवण लवकर उरकून ..मला विविध पक्षांचे अगदी जवळून दर्शन मिळते.
 कॅमेरा सोबत नसल्याने , डोळ्यात दे क्षण साठवून घेतो... अगदी टकमक पाहत .
नकळत आंनद देतात ..... हि पक्षी पाखरे !
- संकेत य पाटेकर
११.०८.२०१४
* खालील फोटो हा अंतरजालातून घेतलेला आहे हे वाचकांनी ध्यानी घ्यावे .

मंगळवार, ७ जानेवारी, २०१४

अन तिनं, चक्क प्रपोज केलं.....


will you marry me ?
क्षणभर मी अडखळंलो ? स्तब्धच झालो.
तोंडातून एक ब्र हि फुटेना ? काय प्रत्युतर द्यावे तिला ? मगासपासून इतकं भरभर मी बोलत होतो तिच्याशी ,
शब्द न शब्द कसे ' एखाद्या सुगंधित फुलांचा सडा जमिनीवर पसरावा, अन त्यात आपण स्वतःला मनोमन झोकून द्यावं , तासनं तास त्या दरवळीत सुगंधात हरपून जावं .....असे !
कुणा मुलीनं स्वताहून प्रपोज करावं हे पहिल्यांदाच माझ्या आयुष्यात घडलं होतं .
सहसा मुलेच मागणी घालतात मुलींना . ज्यावेळेस ते एखाद्या मुलीच्या प्रेमात पडतात .
कारण मुलींचा स्वभाव मूळतः तसा लाजाळू . (सर्वच मुलींना हे लागू होत नाही . हे आताच नमूद करतो . नाहीतर एक एक शब्द फेकून मारलं ..हाहाहा )त्या स्वतःहून कधी प्रपोज करत नाही. पण त्यांच्या नजरेतील भाव कळून जातात . ज्यावेळेस त्या नजरेसमोर असतात .
ते त्या क्षणाची वाटच पाहत असतात . कधी हा आपल्याजवळ आपलं प्रेम व्यक्त करतोय . कधी हा आपल्या मनातील भाव बोलून दाखवतोय . कधी हा आपल्याला मागणी घालतोय. सहसा असंच होतं प्रेमामध्ये .
पण आज मात्र ह्या उलट झालं होतं , तिनेच चक्क मागणी घातली होती. आपल्या मधुर मधाळ अशा शब्दात..
will you marry me ?

मी काही क्षण निशब्द झालो. हो बोलू कि नाही ? कळण्यास मार्ग न्हवता.
पहिल्यांदा कुणा मुलीनं मला अशी मागणी घातली होती.  म्हणून '' मला थडा वेळ दे ' अस म्हणत मी फोन ठेवला . अन विचारांच्या गर्दीत स्वतःला पुन्हा झोकून दिले .
अजून आमची भेट हि घडली न्हवती .

ओळख मात्र फार जुनी.. तीन एक वर्षा पूर्वीची ..! ओर्कुट सारख्या माध्यमातून झालेली.
बोलणं होत होतं एकमेकांच , पण ते फोन वरूनच ...
तिच्या बोलण्यात मात्र एक वेगळेपण होतं , अन तेच खूप आवडायचं.
 वेडा .......वेडू...........झंप्या ...
असे कितीतरी  शब्द ती अगदी प्रेमाने म्हणायची .
तिच्या बोलण्यात जो लाडिकपणा   खट्याळपणा ,  हसरेपणा होता तो खूप स्पर्शून जायचा मनाला  ....
अशीच असावी  आपली एखादी जीवनसाथी.
हसऱ्या  मधाळ शब्दाची , असं मनं मनोमन बोलून जाई स्वतःशीच ...  अन रंगून जाई स्वप्नात.
पण आज ते स्वप्न सत्यात उतरू पाहत होतं . संधी स्वताहून चालून आली होती.
फक्त माझ्या होकारार्थी शब्द हवा होता .
मात्र आमची भेट हि कधी  घडली न्हवती . ती कशी दिसते  ?काय ? ते काहीच ठाऊक न्हवत.
फक्त तिच्या बोलण्यावरून तिच्या स्वभावाची रूपरेखा मी मनात आखली होती.
अन ती मनोमन आवडली होती बस्स..

तसा तिने पूर्ण एक दिवस दिला होता विचार करण्यास ...अन तो दिवस आता जवळ जवळ पूर्ण झाला होता . दुसऱ्या दिवशी सकाळच माझा फोन खणाणला .

मनाची रिंगटोन वाजत   ..
ट्रिंग ट्रिंग..
तिचाच CALL ...
काय रे, काय ठरवलेस मग ?
मी पुन्हा निशब्द झालो. क्षणभर काय बोलावं ते कळेनाच.

पण काही बोलणार इतक्यात तिनेच पुन्हा सुरवात केली.

अरे काल १ एप्रिल होता. 
एप्रिल फुल ..............फसलास नां ?
खर वाटलं   असेल न्हाई तुला.......वेडू... ?
हाहाहाहा ....
नेहमीच्या हास्य शैलीत तिने खो खो हसून घेतले. 
अन मी मात्र तिचं हसणं ....मनात साठवून घेतले.
कुणीतरी पहिल्यांदा प्रपोज केले होते .....पण ते एप्रिल फुल ह्या दिवशी ....
असंच लिहिता लिहिता ...
- संकेत य पाटेकर ०३.०१.२०१३
फोटो सौजन्य - नेट द्वारे

गुरुवार, २ जानेवारी, २०१४

आयुष्य क्षणभंगुर आहे...


आयुष्य क्षणभंगुर आहे ...
कुणास ठाऊक आज आहे तर हे उद्या नसेन कदाचित ..... बस्स प्रेमाने जगत आलो. 
प्रेमाने जगत राहीन .......
प्रयत्नांची पराकाष्टा करेन....
जुळविलेल्या नात्यातील बंध कायम तसच ठेविण्यासाठी . 
 भले हि ..कुणी मला आपलं म्हणो अथवा नाही ....
आयुष्यात नाती मला महत्वाची वाटतात . 
अन ती टिकविण्यासाठी मनाची धडपड सतत चालू असते. 
कुणी रागावतं कुणी आपलं असूनही दुर्लक्ष करतं. 
तरी हि मन म्हणत.. जावू दे रे ..आपलेच आहेत ना ...त्यांना किंमत नाही , पण तुला तर आहे ना ....
एक सच्चा माणूस व्हायचं आहे , प्रेमाने हे जीवन फुलवायचं आहे ....बस्स....... !
जीवन व्यर्थ घालवायच नाही , त्याला अर्थ आणायचं आहे .
मनातले काही ...
संकेत य पाटेकर
०२.०१.२०१४

शुक्रवार, २७ डिसेंबर, २०१३

असचं लिहिता लिहिता ..


हराम खोर , नाव काय तुझं ? बोल रे रताळ्या..बोल ?
ट्रेन मधून येता येता आज हे असे काही शब्द कानी पडले.
अन नजर त्या आवाजाच्या दिशेने त्या व्यक्तीचा शोध घेऊ लागली.
साधारण साठी च्या आसपास असणारे ते गृहस्थ , आपल्या इवल्याश्या गोड नातवाला , 'दरवाज्यात उभ्या असलेल्या एका ओळखीच्या व्यक्ती कडे देऊन , मोठ्याने त्याच नाव चार चौघात विचारात होते.
 ते हि हरामखोर अस पद लावून ?
 बोल रे रताळ्या..बोल ? कुठे चाललो आपण ? बोल परेल ला ? बोल ?
घाटकोपर दम्यान आपल्या नातवा सोबत ट्रेन मध्ये चढलेले ते आजी आजोबा ..त्याच ते चार चौघातल संभाषण दादर येऊ तोपर्यंत मी ऐकत होतो. ऐकण भागच होत म्हणा कान बंद तरी कसे करणार ..
ह्याचे आई बाबा खूप standard आहेत बर ..पण बापूस हरामखोर, आणि आईस पण तशीच . , अगदी मोठ्या आवजात ते गृहस्थ इतरना सांगत .
एका कोपरयात उभी असलेली ती आजी त्याचं बोलणं मात्र निमुटपणे ऐकत . एकवार त्यांच्या नजरेला नजर देत अन पुन्हा इकडे तिकडे पाहत ...अन स्वतःच्या कुठल्याश्या विचाराशी मग्न होतं.
सुरवातीला वाटलं कस सहन करत आल्या असतील ह्या बाई म्हणजे त्या आजी आपल्या नवऱ्याला. इतके दिवस इतकं वर्ष ... चार चौघात नको ते शब्द वापरून ...अगदी मोठ्याने खंबीरपणे बोलणं ...ते हि आपल्या बायको सोबत असताना . ...
क्षणभर डोळे भरून आले ..कुणास ठाऊक , काही एक ओळख नसताना ..फक्त चेहरा अन ते संवाद पाहून डोळे भरून आले. विचारत गढून गेलो काही क्षण ....पण नंतर जाणवलं.
त्यांच्या त्या नको त्या शब्दा मागे प्रेमाचा ओलावा हि होता . वर वर कठोर स्वभावाची दिसणारी माणसे हि आतून काही वेळा फणसाच्या गरया सारखी अगदी मऊ अन गोड असतात ...खरचं..!
ते इथे जाणवलं ..!
असचं लिहिता लिहिता ..
संकेत य पाटेकर
२७.१२.२०१३

मंगळवार, ३ डिसेंबर, २०१३

पहिलं प्रेम - कळून हि न कळलेलं


बाळपनितले खेळकर स्वप्न रंगवून आपण कधी तरुणपणाच्या उंबरठ्यावर येऊन पोहचतो ते कळत हि नाही .पण एकदा का हा उंबरठा ओलांडला कि नव नवीन आव्हानांच ,नव्या जबाबदारयाचं ,मनी वसलेल्या स्वप्नांनाच भार आपल्यावर येऊन ठेपत आणि ते भार आपलं मन हि तितक्याच जिद्दीन उचलून घेत .
अशातच नव नवीन नात्याची गुंफण मनाभोवती जुंपली जाते.
कुठल्याश्या एका क्षणी प्रेमाची गुलाबी झळ मनाला अलगद स्पर्शून जाते .
पहिल्या भेटीची पहिल्या अनामिक ओढीची ती वेळ अगदी समीप येते.
 स्वप्नातली स्वप्न सुंदरी , प्रत्यक्षात सामोरी उभी राहते. अन नजरेतली लपाछुपीच्या खेळास प्रारंभ होऊ लागतो , हास्याची गोड कुपी हळूच उमलू लागते.
प्रेमाचा सुगंधित वारा हृदयातील स्पंदना सोबत हळूच झुलू लागतो . अन प्रेमाचा ज्वर अंगभर जडू लागतो .
आयुष्यात एकदा तरी आपण कुणाच्या तरी प्रेमात पडतोच .
तेंव्हा मन गाऊ लागतं , नाचू बागडू लागत , पंख नसताना हि दिशा दिशा तिच्या शोधार्थ घिरट्या घेऊ लागतं . स्वस्थता हि कुठे नसतेच तशी मनाला...
विचार हि तिचेच , भास ते हि तिचेच. स्वप्नात ती मनात ती सर्वत्र तीच अन तीच ...
प्रेम हे अस असतं  वेड पीस ...
स्वतःच अस्तित्व हि विसरायला लावणारं स्वर्गाहून  सुंदर...
 पण ते मिळाल तर अन्यथा स्वतःच्या अस्तित्वाची पुन्हा पुन्हा जाणीव करून देणार , जीवनाची व्याख्या अनुभवाने आपल्या मनाशी ठसवून सांगणार अस हे प्रेम ....
काही वर्षापूर्वी असच एका प्रवासात तिची नि माझी भेट घडली .
अन पाह्ताच क्षणी प्रेमातं पडणं म्हणजे नक्की काय असत ते प्रत्यक्ष अनुभवलं .
 तीच गोड स्मित हास्य , तिचे मधाळ शब्द , तीच हसर साजेर रूप मनावर जादू करून गेल .
 एक अनामिक ओढ लागली मनास , क्षण क्षण तिच्या आठवणीत गुंफू लागले. शब्दांनाही कवितेची धार चढू लागली. अन हा हा म्हणता पहिली कविता तिच्यावर रचली गेली.
शब्द होते वेडे वाकडेच पण भावना मात्र कागदावर हळूच उमटून गेल्या .
पुढील भाग लवकरच ... :)
 क्रमश :-
संकेत य पाटेकर
०३.१२.२०१३

बुधवार, २७ नोव्हेंबर, २०१३

अमानवीय...अनाकलनीय...


काही दिवसांपूर्वी मायबोलीवरील एक लिंक वाचली होती '' अमानवीय'' भूता खोतीच्या गोष्टी ..!
मायबोलीकरांनी त्यांना आलेले वेगवेगळे अमानवी अनुभव जे अनाकलनीय होते ते त्यात लिहून काढले होते . ते वाचताना मी मात्र अगदी झपाटून गेलो होतो.
 अर्थात मला अशा गोष्टी कधी कधी वाचायला खूप आवडतात !
असो...
आज ती लिंक माझ्या पुन्हा वाचण्यात आली अन मनाने बस्स ठरवलं , आपणही लिहूया मला आलेले ते २-३ अनुभव..!
अन लिहावयास घेतले.
लहानपणा पासूनच तसं आपण भूता खोतीच्या बऱ्याच गोष्टी ऐकून असतो , आपल्या आजोबांकडून , मामाकडून आई बाबांकडून , मित्र परीवारांकडून ...
पण त्यावर आपला विश्वास असा नसतोच , पण ज्यावेळेस अशा गोष्टी आपण स्वतहा अनुभवतो तेंव्हा मात्र मनाची खात्री पटते . एक अमानवीय शक्ती जरूर असावी अस मन गृहीत धरतं  .
एक वेगळ अस विश्व असावं त्याचं . एक उद्देश असावं त्यांच्या असण्याचा :) अर्थात त्यातल एक , ' आपल्या मनात भीतीच सावट पसरवणं हे , किंव्हा एकतर झपाटून टाकणं हे होय. असो
तर काही वर्षा पूर्वी , ' साधारण ०९-१० वर्षा पूर्वीची हि गोष्ट.
 मी माझ्या आई बाबांसोबत गावी निघालो होतो. आमचं गाव तसं मुंबई पासून फारच जवळ , '' पाली'' बल्लाळेश्वर अष्टविनायक क्षेत्रापैकी एक , तिथपासून एसटी ने पाऊन एक तासात ,
आमच्या गावी पोहचता येत .
संध्याकाळची वेळ होती. खोपोली - पाली एसटी ने आम्ही खुरावला फाट्यावर उतरलो .
 पाली वरून चंदरगाव ला(आमच्या गावी )जाणारी एसटी ५ वाजता रोजच्या तिच्या दिन क्रमानुसार खुरावला फाट्यावर येणार होती . म्हणून आम्ही तिघे, मी बाबा नि आई ताटकळत उभे होतो एसटी ची वाट पाहत .
पण ५ वाजून गेले तरी, अजून एस टी चा काही पता न्हवता.
तेंव्हा मनात एक विचार मात्र येऊन गेला कि समजा एस टी नाही मिळाली , रद्द केली , किंव्हा आलीच नाही तर , तर काय ? इथेच राहायला लागणार कि काय ?
 कि अंधाऱ्या रात्री सामसूम असलेली डोंगर दरयाची निरवस्तीची वाट तुडवीत घर गाठाव लागणार ?
कारण आमच्या गावी जाण्यासाठी हि शेवटची एस टी होती .
आणि आता साधारण पावुणे सात वाजत आले होते . मावळतीचे प्रकाश किरणे हि आता धूसर होत होते.
दिवसातून तसे दोनच वेळा आमच्या गावी '' एस टी' ची चाके डांबरी रस्त्याकडून लाल मातीच्या वळणदार रस्त्यावरून लोळवन घेत इथवर फिरकतात . एक सकाळी आणि एक संध्याकाळी .
त्यामुळे जर का एकदा एस टी रद्द झाली किंव्हा निसटली वेळे आधीच, तर मात्र एक -दीड तासाची डोंगर दर्यातून मळलेली नीर वस्तीची वाट तुडवावी लागे.
एक वेळ शहर असत तर ठीक असत , कारण दिव्यांचा लखलखाट अन मानवी वर्दळ तिथे अहो रात्र हि चालूच असते . पण गावा कडच्या वाटेतून रात्री अपरात्री रानावनातून प्रवास करायचं म्हणजे एक दिव्यच , एक धाडसच जणू , जास्त करून ते शहरातल्याच लोकांना.
वाटेतून जाताना , ' एक एक चित्र - विचित्र , आकृती नजरेसमोर नाचू लागतात काय?
 वेगवेगळ्या आवाजांचा घूमघुमाट कानी येऊ लागतो काय ?
 एक अनाहक भीती मनाभोवती वावरत राहते काही वेळ . जोपर्यंत आपण त्यातून मार्गीस्थ होत नाही.
आज नेमक आमच्या , आमच्या म्हणण्या पेक्षा माझ्या वाटेला हे आलं. . आमच्या गावी जाणारी एस टी काही आली नाही . पण आमचा अमुल्य वेळ मात्र वाया गेला . त्यामुळे रात्री वस्ती ला जाणारी महागाव ह्या शेवटच्या एस टी ने आम्ही पडसारा फाट्याजवळ उतरते झालो.
मी घड्याळात डोकावून पाहिलं , तर साडे सात झाले होते . वर आकाशी पूर्णाकृती चंद्र आणि त्याचा शीतल सौम्य प्रकाश सर्वत्र पसरला होता , त्यामुळे रात्र असूनही प्रकाशाचं तेज आम्हा सोबत होत . त्यामुळे योग्य ती वाट शोधण्यात अडथळा येणार न्हवता .
तसे आम्ही तिघे असल्या कारणाने घाबरण्याचा हि प्रश्न न्हवता . इथून गावं तसं १ तासाच्या अंतरावर . त्यामुळे वेळ न दवडता पायपीट सुरु झाली. आमच्यापैकी फक्त बाबांनाच वाट माहित होती .
त्यामुळे पुढे ते नंतर मी नि मग आई . असा आमचा क्रम लागलेला .
---------------------------------------------------------------------------------------------------------------------
सर्वत्र तसा शुक शुकाट होता . चांदण्या रात्री मुळे पायाखालची वाट दिसण्यात येत होती . 
 पण रातकिड्यांची किर्र किर्र अन वाऱ्याची लहरी झेप अंगीकानी सर्रकन स्पर्शून जायची . 
 मधेच एखाद्या झाडाची वेडीवाकडी चित्र विचित्र आकृती नजरेस पडायची. आणि भयेच शाषण मनावर लागू व्हायचं. मन स्वतःलाच सावरायचं '' भूत बित काही नसत रे '' तू चल मुकाट्याने .
अशातच आम्ही अर्धा तासाची पायपीट पूर्ण केली .
अर्ध्या वाटेवर पोहचलो अन तोच मागून एक किलकिलाट कानी आला .आणि त्या कर्कश आवजाने कानाच्या दडीच बसल्या , मन कावरं बावरं झालं.
इकड तिकड पाहू लागलं आसपास अन दूरवर हि कुणीच अन काहीच दिसत न्हवत . तो एक आक्रोश होता , लहान मुलाच्या रडण्याचा , पण फारच भयानक .........भयग्रस्त !
तो कुठून कसा येत होता ते काही कळत न्हवत. पण मनाची घाबरगुंडी तेंव्हा नक्कीच उडाली होती.
 तो आवाज हि कुणास ठावूक मलाच ऐकू येत होता . आई बाबा तर निवांत चालत होते.
 त्यामुळे ते भय मनात साठवूनच मी आई बाबांन सोबत पुढे चालू लागलो. अन पुढे एका वाड्या पाशी येउन थांबलो. गुरांचा तो एक जुनाट वाडा होता .
तो सोडल्यास तिथे झाडी झुडपान शिवाय काहीच न्हवतं . बाबा तिथे का थांबले ते कळल नाही तेंव्हा .
पण पुन्हा त्यांनी त्यांची पाउलं मागे घेतली तेंव्हा समजल कि आम्ही वाट चुकलो होतो , भलत्या ठिकाणची येउन पोहचलो . त्यामुळे मनात अजून धडकी भरली.
अजून गाव तसं नजरेस पडल न्हवत . त्यामुळे आपण आजच पोहचू ना ?अशी अवस्था झाली होती .
त्यात तो केविलवाणा आक्रोश हि अधून मधून कानी पडत होता . पिच्छा सोडत न्हवता , त्यामुळे भयाच सावट सारया अंगभर पसरल होत. कधी एकदा घरी पोहोचतोय अस झालं होतं. त्यात आम्ही वाट चुकलो होतो.
पुढे बाबांनी कुठलीशी एक वाट पकडून . झाडी झुडपातून , दगड धोंड्यातून मार्ग काढत पुढची वाटचाल सुरु ठेवली . अन असंच मजल दरमजल करत आम्ही काही वेळेत एका टेकडीवर येउन पोहचलो.
काही क्षण पाउलं तिथेच थांबली दूर वर नजर फिरली, दूरवर काही अंतरावर दिव्यांच्या हलकासा प्रकाश नजरेत भरू लागला . म्हणजेच गाव आता काही हाकेच्याच अंतरावर होत . आणि आम्ही काही वेळेतेच घर गाठणार होतो. त्यामुळे तनामनात पुन्हा शक्ती संचारली अन पाउलं पटपट करत गावच्या दिशेने सरकू लागली .................!
हा माझा पहिला अनुभव होता ...! तो '' केविलवाणा पण भयग्रस्त आवाज '' हा भास होता कि दुसर काही ते माहित नाही . पण तेंव्हा मनाची घाबरगुंडी नक्कीच वळली होती . :)
२८.११.२०१३
-----------------------------------------------------------------------------------------------------------------
हा माझा पहिला अनुभव होता ..आता दुसर्या अनुभवाकडे कडे वळूया....
उत्सवाचे दिस होते..
घरा घरात गणपती बाप्पाचे अगदी थाटा माटात आगमन झाले होते.
उदबत्ती नि आरास अन देखण्या बाप्पाच्या प्रतिमेने एक एक घर अगदी उजळून निघाले होते .
 रात्रीच्या लुकलुकत्या काजव्यां सारखं गावं हि आता शहरातल्या आप्त मंडळींनी अन विविध रंगी प्रकाश छटांनी अगदी रंगून गेलं होतं . चैतन्याचा नवां गंध सर्वत्र दरवळू लागला होता .
 ' गणपती बाप्पा मोरया ' च्या गजरात ध्यान मग्न होवून भक्तिरसात जो तो न्हाहून निघत होता.
त्याची कृपा दृष्टी सदैव आपल्या सोबत राहावी ह्यासाठी त्याच्या चरणी जो तो माथा टेकी. नतमस्तक होई. आपलं मन हलक करी.
अन पुन्हा इतक्या दिवसाच्या भेटीने एकमेकांची खुशालकी विचारात अवांतर गप्पा गोष्टींत लहान थोर सारेच दंग राही.
ह्यातच दिवस पलटत होते. बाप्पाच्या परतीचे दिवस जवळ येऊ लागले होते. दीड दिवसाच्या बाप्पाला ' पुढच्या वर्षी असाच लवकर ये' म्हणत आनंदाश्रुने निरोप दिला जात होता.
आता वेळ होती ती पाच दिवसाच्या गणपती बाप्पाची . दीड दिवसाच्या विसर्जना नंतर एकामागाहून एक दिवस कसे पटापट निघून गेले हे लोकांना हि कळेना .
आनंदाचे हसरे क्षण कसे पटकन निघून जातात न्हाई . त्यांना थांबवता येत नाही. अन मुठीत हि ठेवता येत नाही पण आठवणीच्या गाठोड्यात त्यांना जागा मिळून जाते. कधीतरी पुन्हा एके क्षणी मुखी हास्य फुलविण्यासाठी . तर असो.
गौरीचं एव्हाना आगमन झालं होतं . पाच दिवसाचे आपले लाडके बाप्पा आपल्या घरी परतले होते.
काही अजून २ दिवस थांबू म्हणत भक्ताच्या प्रेमापोटी थांबले होते . ' मी बाबा आता आपल्या आई सोबतच परतणार अस जणू हट्टाने म्हणत .... पण काही पाहुणे मंडळीची रजा संपल्यात जमा होती.
त्यामुळे त्यांना शहरात परतन क्रमपात होत. कामावर जे पुन्हा रुजू व्ह्यायचं होतं.
रात्रीची साडेबारा एकचि वेळ डोंगर दर्यातलं निसर्गाच्या कुशीत वसलेलं आमच चिमुकलं अस गावं . रातकिड्यांच्या किर्र किर्र आवजात संगीत खेळीत मश्गुल झालं होत. गावाच्या वेशीवर गावातला सारा गोतावळा एकवटीने जमा झाला होता. पाहुणे मंडळीनां निरोप धाडायास. अजून दोन दिस थांबा , गौरी विसर्जन करूनच जा . अस कुणीतरी त्यातच आग्रहान्रे म्हणालं. पण जाणे भागच होतं.
दिवसाभरातुन दोनच वेळ इस्टी ची काय ती सेवा . सकाळ - सायंकाळ . ती हि मनधरणी प्रमाणे. आली तर आली. वरना छु .. त्यामुळे गावातलाच एक धान्याची ने आण करणारा टेम्पो आधीच पाहून ठेवला होतां . रातीच्या प्रवासासाठी. ....
साधारण १७-१८ जनाचा आमचा चमू निघण्यास तयार झाला. सुसाट सुटणाऱ्या गाडीच्या वेगा सारखा घड्याळाचा काटा हि सुसाट सुटला होता .
गणेशाला वंदन करून , अन नारळ फोडून ..सर्वांचा निरोप घेत गाडीने हळू हळू वेग धरला अन रात्रीच्या निरव शांततेत आमचा प्रवास सुरु झाला . सुरवातीला सुरु असलेली आप आपसातली बडबड काही वेळाने शांत झाली. अन एक गूढ शुकशुकाट पसरला . घनदाट काळोख्या जंगलातून , दुर्तफा झाडीतून गाडी पुढे सरकू लागली. टेम्पोच्या अगदी शेवटच्या टोकाला मी बाहेरच काळोख दृश्य मनात साठवत होतो.
किती रहस्यमय रात्र आहे ..... एक अनोखं जग..... किती गूढ दडले असतील ह्यात.... आपल्यासाठी रात्र जरुरू आहे . पण इतर जीवांसाठी मात्र दिवस ... . मनातच एक एक विचाराला उधाण आले होते. बाहेरच जग न्ह्याहाळ न्यात जणू नजर अगदी उतावळी झाली होती.
अशातच कश्ल्याश्या आवाजाने कान टवकारु लागले. काहीतरी नजरेसमोर चमकू लागलं . नजरेसमोर ती आकृती आकार घेऊ लागली. दोन ईसम, बाईक वरती स्वार असलेले नजरेस दिसू लागले. पण कालोख्यामुळे चेहरा स्पष्ट दिसत न्हवता. जवळ जवळ रात्रीचे दोन वाजत आले होते . इतक्या अंधुक राती , घनदाट जंगलातून कोण बरे येत असणार , मनात शंकाची पाल चूकचुकली. शेवटच्या टोकाचे आम्ही २-३ सोडले तर इतर सर्व गाढ झोपी गेले होते.
नजर एकसारखी बाहेर पडे. लपाछुपीचा खेळ मांडावा तसा ते बाईक स्वार मधेच गायब होतं मधेच दिसे . त्यामुळे एक भीतीदायक वलय मनाभोवती फिरकू लागलं होतं . काहीतरी अघटीत होईल ह्याची चाहूल मनाला लागू लागली. तरीही धीटपणाने मन स्वतःशीच पाठ थोपू लागला. अन गाडी त्याच वेगात पुढे मार्गीक्रमण करू लागली. घनदाट काळोख्या जंगलाचा मार्ग आता मागे राहिला होता. रस्त्याच्या कडे कडे ने उभ्या असलेल्या मोठ मोठ्या कारखान्याच्या दिशेने गाडी पुढे सरकू लागली. मनातली शंकाची पाल केंव्हाच मिटली होती. रात्रीची झोप मात्र आता अनावर झाली होती . त्यामुळे डुलक्या येऊ लागल्या. तन-मन पेंगू लागलं . अन तेवढ्यात धाड ssss म असा आवाज झाला. एकंच किलकिलाट सुरु झाला .
क्षणभरातच गाडीने पलटी घेतली . गाडीच्या एका बाजूला असलेले सारे दुसर्या बाजूकडे फेकले गेले. एकमेकांवर आदळले गेले. ... टेम्पो मध्ये ठेवण्यात आलेला एक भला मोठा टायर हि खालच्या दिशेने फेकला गेला. त्याच्या लोखंडी कडयान मात्र कुणी एक जखमी झालं . तर कुणाला मुका मार लागला .तर कुणी ढसा ढसा रडू लागलं. पण नशिबाने मात्र सारेच बचावले होते .
मनात चूकचूकलेली ती शंका शेवटी खरी ठरली होती. एक अघटीत घडल होतं. पण ते बाईकस्वार कोण? कुठले होते , इतक्यां रात्री ते अचानक कुठून आले अन कुठे गेले. अन मलाच का दिसत होते ,कि तो निव्वळ भास होता ? कि इतर काही ? त्याचं कोड अद्याप हि सुटलं न्ह्वत.
अमानवीय...अनाकलनीय...
- संकेत पाटेकर
०२.०९.२०१४

गुरुवार, २१ नोव्हेंबर, २०१३

एक '' क्षण '' हसरा अन .... !!


आज २१ नोवेंबर , हि तारीख मी कधी विसरणार नाही.
एकीकडे त्या मांगल्य ' क्षणाचा' आनंद तर दुसरीकडे आपल्यापासून ती '' काही महिन्यांपासून योगायोगाने भेट घडलेली अन पुढे हळुवार प्रेमाचा परिश स्पर्श करून मायेने आपलंस करणारी, गोड शब्दांनी ' क्षणांनाही ' अन मनालाही हि फुलवणारी , ती खास जिवलग व्यक्ती आपल्यापासून आता दुरावणार हि भावना मनाला स्वस्थ बसू देत न्हवती . त्यामुळे डोळे हि अशा जड अंतकरणाने भरून आले होते. 
हे नातंच तसं होतं नि आहे . 
एका अनमोल रत्नाच बहिण - भावाचं.
जी गोष्ट आपल्या जवळ नसते . त्याची किंमत माणसाला कळून येतेच . अन त्याच महत्व हि तो जाणून असतो . मग ती वस्तू असो वा व्यक्ती वा तीच प्रेम अन सहवास ते मिळविण्यासाठी तो सतत धडपडत राहतो.
माझ्या बाबतीत हि असचं होत . लहानपणापासून एक आपली हक्काची बहिण असावी अस नेहमी वाटायचं. तिच्यासोबत लाडी बोलीन भांडाव , खेळ - मस्तीत दोघांनी हि रमावं. रक्षाबंधन , भाऊबीज ला तिने मनोभावे ओवाळाव अस मनापासून वाटायचं . पण नुसतं वाटून काय उपयोग .
 योग्य वेळी योग्य तेच द्यायचं हा त्या उपरवाल्याचा शिरस्ता.
त्यामुळे सख्खी बहिण जरी नसली तरी , योगा योगाने तो दिवस जवळ आलाच नि भेट घडून दिली त्याने एका मनमिळावू प्रेमळ बहिणीशी . मनाची शांती झाली . कारण हवी तशी बहिण मिळाली .
तिच्या सहवासातला एक एक दिवस आनंदाने हर्षाने कंठू लागला . नि तोच एक दिवस '' तिचे शब्द कानी पडले '' संकु ' माझ लग्न ठरलंय''
तिचे हे वाक्य इतकं मनाला भिडलं कि डोळे आसवांनी भरून आले . भावना हि हळव्या झाल्या .
आवाज हि कापरा झाला . काय बोलाव ते सुचेना . तरीही शब्द फुटले '' तू मला विसरणार तर नाही ना ?
नाही रे अजिबात नाही !
तू माझ्या आयुष्यातला एक महत्वाचा भाग आहेस तुला कस मी विसरणार , समोरून उत्तर आल नि मनाला एक दिलासा मिळाला .
त्या क्षणी आनंद न्हवता असे न्हवे आनंद होताच , कारण मुलींच्या अन मुलाच्या आयुष्यातला तो एक मोठा सोनेरी क्षण , कुणाचं आयुष्याचं त्याने सोन होतं तर कुणाच्या आयुष्याचं मातीमोल . ( अर्थात ते सार एकमेकांना ते कसे समजून घेतात त्यावर अवलंबून असत.)
बहिणीच लग्न होणार होत . त्यामुळे दुरत्वेच्या त्या भावनेने माझ मन मात्र थोडं दुखावलं गेल होत .
 काही दिवसांपूर्वीच तिची भेट घडावी अन एक दोन दिवस तिच्या सहवासात जाताच तोच तीच लग्न ठराव . काय म्हणावं ह्याला ....!
कसं नशीब असत एकेकाचं..न्हाई ! काही गोष्टी मिळतात ते हि क्षणासाठी क्षणभराचा आनंद फक्त , क्षणभराचा सहवास नि प्रेम ....पण तोच पुरतो आयुष्यभर ..!
लग्न हे मुलींच्या आयुष्यातला तसा दुसरा पर्व , दुसरा जन्म ! माहेरील व्यक्तींना सोडून सासरच्या नव्या घरी जाताना तिथल्या लोकांसमवेत सार काही सांभाळताना त्यांच्या मनाची सतत धडपड सुरु असते . अशातच एक एक दिवस निघून जातात . अन आपल्या लोकांनाच वेळ द्यायला त्यांज्याजवळ वेळ पुरत नाही .
लग्ना नंतर तसं एकमेव नातं उरत ते म्हणजे '' नवरा अन बायकोच '' अस माझ प्रामाणिक मत . इतर नाती हि असतातच पण लग्नाआधीचे अन लग्ना नंतरचे दिवस ह्यात फार फरक पडलेला असतो. नाती सर्व तीच असतात . पण बहरलेले ते दिवस पुन्हा येतातच असे न्हवे ...असो शेवटी प्रेम हे प्रेम असत ... त्याला मरण नसतं ते हृदयात नेहमी तेवत असतं ..!!
तुझं ह्या भावावर असलेले प्रेम असंच तेवत रहो ..सदान सदा !!
माझ्या गोड प्रेमळ बहिणीला तिच्या लग्नाच्या वाढ दिवसा बद्दल खूप सार्या हर्षित शुभेच्छा.. !! तुमचं जीवन हास्याने आनंदाच्या सुवर्ण क्षणांनी सदा उजळून निघोत ..हीच त्या परमेश्वरा जवळ प्रार्थना ..!!
संकेत उर्फ संकु ..!!
२१.११.२०१३ गुरवार